मेलबर्न : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार नेमका किती वाजता सुरु होणार आहे, याबाबतचे अपडेट्स आता समोर आले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ़पाऊस पडणार असल्याची जोरदार शक्यता आहे. कारण हा सामना मेलबर्न येथे रविवारी होणार आहे. रविवारी मेलबर्न येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना नेमका कधी सुरु होणार, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. पण हा सामना आता किती वाजता सुरु होणार आहे, याचे कारण आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी मैदानाची पाहणी ही साधारणपणे दुपारी १२.०० च्या दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सामन्याचा टॉस होईल. टॉसचा निकाल लागल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार हे आपलं संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपाला संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासांचा ब्रेक घेतला जाईल. या ब्रेकनंतर हा सामना दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना दुपारी १.३० ते साधारणपणे ४.३० वाजेपर्यंत पाहायला मिळू शकतो. पण जर पावसाने या सामन्यात घोळ घातला तर मात्र हा सामना कधी सुरु होईल, हे सांगणे सर्वात कठीण असेल. कारण पाऊस थांबल्यावर सामन्याचे पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर मैदान कधी सुकवलं जाईल याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर मैदान सुकले की नाही याची ते पुन्हा पाहणी करतील आणि त्यानंतर दोन्ही संघांना सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार, याची कल्पना देतील. त्याचबरोबर हा सामना किती षटकांचा खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही ते दोन्ही कर्णधारांना देतील. त्यानंतर दोन्ही संघ या माहितीनुसार आपली रणनीती आखतील.
आतापर्यंत भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठे प्रयोग केले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळला नव्हता. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या भन्नाट फलंदाजीमुळे भारताने विजय साकारला होता. दुसऱ्या सराव सामन्यात लोकेश राहुलकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले होते, पण हा सामना भारताला गमवावा लागला होता. तिसऱ्या सराव सामन्यात भारताने संघातील अनुभवी खेळाडूंना संधी दिली असली तरी यामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले होते. या सामन्यात रोहित शर्माने संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला फक्त एकच षटक दिले होते. या एकाच षटकात शमीने तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सराव सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात ़पाऊस पडणार असल्याची जोरदार शक्यता आहे. कारण हा सामना मेलबर्न येथे रविवारी होणार आहे. रविवारी मेलबर्न येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सामना नेमका कधी सुरु होणार, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. पण हा सामना आता किती वाजता सुरु होणार आहे, याचे कारण आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी मैदानाची पाहणी ही साधारणपणे दुपारी १२.०० च्या दरम्यान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सामन्याचा टॉस होईल. टॉसचा निकाल लागल्यावर दोन्ही संघांचे कर्णधार हे आपलं संघ जाहीर करतील. दोन्ही कर्णधारांनी आपाला संघ जाहीर केल्यावर अर्ध्या तासांचा ब्रेक घेतला जाईल. या ब्रेकनंतर हा सामना दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना दुपारी १.३० ते साधारणपणे ४.३० वाजेपर्यंत पाहायला मिळू शकतो. पण जर पावसाने या सामन्यात घोळ घातला तर मात्र हा सामना कधी सुरु होईल, हे सांगणे सर्वात कठीण असेल. कारण पाऊस थांबल्यावर सामन्याचे पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर मैदान कधी सुकवलं जाईल याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर मैदान सुकले की नाही याची ते पुन्हा पाहणी करतील आणि त्यानंतर दोन्ही संघांना सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार, याची कल्पना देतील. त्याचबरोबर हा सामना किती षटकांचा खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही ते दोन्ही कर्णधारांना देतील. त्यानंतर दोन्ही संघ या माहितीनुसार आपली रणनीती आखतील.
आतापर्यंत भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठे प्रयोग केले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळला नव्हता. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या भन्नाट फलंदाजीमुळे भारताने विजय साकारला होता. दुसऱ्या सराव सामन्यात लोकेश राहुलकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले होते, पण हा सामना भारताला गमवावा लागला होता. तिसऱ्या सराव सामन्यात भारताने संघातील अनुभवी खेळाडूंना संधी दिली असली तरी यामध्ये त्यांनी बरेच प्रयोग केले होते. या सामन्यात रोहित शर्माने संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला फक्त एकच षटक दिले होते. या एकाच षटकात शमीने तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा सराव सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.