दुबई : रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपद देण्यात आले होते. पण या सामन्यात कर्णधार असूनही रोहित ६० धावांवर असताना निवृत्त झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित कर्णधार असूनही यावेळी निवृत्त का झाला, हा प्रश्न बऱ्याच चाहत्यांना पडला होता.
रोहित निवृत्त का झाला, जाणून घ्या कारण...ऑस्ट्रेलियाच्या १५३ धावांचा पाठलाग करताना भारताने झोकात सुरुवात केली होती. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी यावेळी ९.२ षटकांत ६८ धावा केल्या होत्या. राहुल यावेळी ३९ धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यावरही रोहितने धडाकेबाज फटकेबाजी सुरु ठेवली आणि आपेल अर्धशतक साकारले. पण अर्धशतक साकारल्यावर रोहित जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून खेळल्याचे पाहायला मिळाले नाही. रोहितने यावेळी ६० धावांवर असताना निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहित कर्णधार असूनही त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पण यामागे एक महत्वाचे कारणही आहे. सराव सामने हे प्रयोग करण्यासाठी असतात. रोहित शर्माने १५ व्या षटकात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या पाच षटकांमध्ये भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहण्याचा यामागे उद्देश होता. कारण एखादा खेळाडू जर कमी चेंडू असताना खेळायला आला तर त्याच्यावर दडपण येऊ शकते किंवा त्याला स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहण्यासाठी रोहित शर्माने कर्णधार असतानाही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात साधारणत: अर्धशतक किंवा शतक झळकावल्यावर निवृत्ती घेतली जाते. याबाबत कोणत्याही खेळाडूवर सक्ती नसते. पण संघाची रणनिती किंवा संघातील अन्य खेळाडूंसाठी ते महत्वाचे ठरते. त्यामुळे संघहितासाठी ही गोष्ट प्रत्येक खेळाडूला करावी लागते. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पाहिला तर त्यामध्ये इशान किशनही ७० धावा झाल्यावर निवृत्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे प्रत्येक संघ असे प्रयोग सराव सामन्यात करत असल्याचे पाहायला मिळत असते.
रोहित निवृत्त का झाला, जाणून घ्या कारण...ऑस्ट्रेलियाच्या १५३ धावांचा पाठलाग करताना भारताने झोकात सुरुवात केली होती. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी यावेळी ९.२ षटकांत ६८ धावा केल्या होत्या. राहुल यावेळी ३९ धावांवर बाद झाला. राहुल बाद झाल्यावरही रोहितने धडाकेबाज फटकेबाजी सुरु ठेवली आणि आपेल अर्धशतक साकारले. पण अर्धशतक साकारल्यावर रोहित जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून खेळल्याचे पाहायला मिळाले नाही. रोहितने यावेळी ६० धावांवर असताना निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहित कर्णधार असूनही त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला. पण यामागे एक महत्वाचे कारणही आहे. सराव सामने हे प्रयोग करण्यासाठी असतात. रोहित शर्माने १५ व्या षटकात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या पाच षटकांमध्ये भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहण्याचा यामागे उद्देश होता. कारण एखादा खेळाडू जर कमी चेंडू असताना खेळायला आला तर त्याच्यावर दडपण येऊ शकते किंवा त्याला स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहण्यासाठी रोहित शर्माने कर्णधार असतानाही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात साधारणत: अर्धशतक किंवा शतक झळकावल्यावर निवृत्ती घेतली जाते. याबाबत कोणत्याही खेळाडूवर सक्ती नसते. पण संघाची रणनिती किंवा संघातील अन्य खेळाडूंसाठी ते महत्वाचे ठरते. त्यामुळे संघहितासाठी ही गोष्ट प्रत्येक खेळाडूला करावी लागते. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पाहिला तर त्यामध्ये इशान किशनही ७० धावा झाल्यावर निवृत्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे प्रत्येक संघ असे प्रयोग सराव सामन्यात करत असल्याचे पाहायला मिळत असते.