अ‍ॅपशहर

T20 World cup : विराट गेल्या ११ वर्षांपासून या विक्रमासाठी झगडतोय; यंदा स्वप्न पूर्ण होणार?

ICC T20 World cup : विराट कोहलीचा अलीकडचा फॉर्म फारसा चांगला राहिला नाही, पण मोठे खेळाडू नेहमीच मोठ्या स्टेजवर चांगली कामगिरी करतात. अशा परिस्थितीत विराट कोहलीला यावेळचा विश्वचषक संस्मरणीय बनवायला आवडेल.

Lipi 18 Oct 2021, 3:50 pm
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या काळातील महान फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटपासून एकदिवसीय आणि टी-२०, क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याची बॅट धावांची बरसात करते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय विराटच्या नावावर ७० शतके आहेत. आणि सरासरीही ५५ पेक्षा जास्त. १३ वर्षांच्या कारकिर्दीत विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. फलंदाजीमध्ये त्याने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकरलाही अनेक वेळा पिछाडीवर टाकलं आहे, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक विक्रमही राहिला आहे, ज्यासाठी विराट गेल्या ११ वर्षांपासून झगडताना दिसत आहे. ते म्हणजे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील शतक.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम will indian captain virat kohli score a century in icc t20 world cup
T20 World cup : विराट गेल्या ११ वर्षांपासून या विक्रमासाठी झगडतोय; यंदा स्वप्न पूर्ण होणार?


वाचा- Video: कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला

२०१० साली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ९० सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३१५९ धावा केल्या आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या धावा केल्या नाहीत. पण इतक्या धावा करूनही त्याने आतापर्यंत एकही शतक झळकावलेले नाही. यंदा टी-२० विश्वचषकादरम्यान विराट शतक झळकावणार का? याचीच वाट त्याचे चाहते पाहत आहेत.

वाचा- किंग इज बॅक; कोणाला वाटले नव्हते तो पुन्हा येईल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सर्वाधिक अर्धशतके
विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत शतक केले नसले तरी त्याच्या नावावर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत एकूण २८ वेळा ५० धावांचा आकडा पार केला आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण २२ अर्धशतके आहेत.

वाचा- भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या युवराजला अटक; पाहा कोणची चूक केली होती

शतक हुकले
जर विराटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीवर नजर टाकली, तर तो तीन वेळा शतक पूर्ण करण्यात चुकला आहे. विशेष गोष्ट म्हणजे, शतकाच्या जवळ पोहोचला असताना तिन्ही वेळा तो नाबाद राहिला आहे. जानेवारी २०१६ मध्ये अॅडलेड मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो ९० धावांवर नाबाद राहिला. त्याच वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध ८९ धावा केल्यावर तो नाबाद राहिला. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये त्याला पुन्हा एकदा वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावण्याची संधी मिळाली, पण त्याला ९४ धावांवर समाधान मानावे लागले.

वाचा- 'मला स्वत:चा बेड देऊन तो जमिनीवर झोपला होता'; भारतीय खेळाडूने सांगितले धोनीसोबतचे किस्से

टी-२० मध्ये शतक
जर एकूण टी-२० क्रिकेटबद्दल बोललो, तर विराट कोहलीने या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत एकूण ५ शतके केली आहेत. २०१६ च्या आयपीएलमध्ये त्याने गुजरात लायन्सविरुद्ध फक्त ५३ चेंडूत शतक झळकावले होते. त्यामुळे यंदाच्या टी-२० विश्वचषकात शतक झळकावून तो संस्मरणीय बनवायला विराटला आवडेल.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक पराभव; पाहा भारतीय संघावर काय परिणाम होणार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज