अ‍ॅपशहर

​कुंबळेशिवाय टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना झाला आहे. भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे संघासोबत न गेल्याने कुंबळे आणि विराट यांच्यातील कटूता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Maharashtra Times 20 Jun 2017, 5:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india departs for west indies kumble stays back for icc meeting
​कुंबळेशिवाय टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना


कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना झाला आहे. भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे संघासोबत न गेल्याने कुंबळे आणि विराट यांच्यातील कटूता पुन्हा एकदा समोर आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात पाकिस्तान संघाकडून भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारतीय कोच अनिल कुंबळे यांचा एक वर्षाचा करार संपला असून त्यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कोच म्हणून कायम ठेवले असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लंडनहून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना झाला परंतु कोच अनिल कुंबळे हे २३ जूननंतर वेस्ट इंडिजला जाणार आहेत. २२ आणि २३ जून रोजी लंडनमध्ये आयसीसीची एक बैठक होणार असून या बैठकीत आपल्याला सहभागी व्हायचे असल्याने आपण भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजला जाऊ शकलो नाही, असे अनिल कुंबळे यांनी सांगितले.

आयसीसीच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर आपण वेस्ट इंडिजला जाणार आहोत, असे अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. २३ जूनपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज मालिकेत ५ वनडे आणि एक टी-२० सामना खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात पुन्हा कटूता आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज