मोहिंदर अमरनाथ
विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळविलेला हा नितांतसुंदर असा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेतच पराभूत केल्यामिुळे या विजयाला वेगळे महत्त्व प्राप्त होते. कर्णधाराने पुन्हा एकदा आघाडीवर राहात आपली कामगिरी चोख बजावली आहे. मग ती फलंदाजी असो की, गोलंदाजी किंवा नेतृत्व. आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचे आहे, हेच विराटच्या खेळातून दिसून येत होते. रोहित शर्माची खेळी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. या दौऱ्यात आधी रोहित शर्माला जे चेंडू खेळताना अडचण जाणवत होती, ती आता दूर झाल्यासारखी दिसते आहे. सलामीला येत एका मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची ताकद रोहितमध्ये आहे. आघाडीच्या फळीतील कुणीतरी उभे राहण्याची गरज होती आणि रोहितने ती पूर्ण केली. आतापर्यंतच्या वनडे लढतीत विराट किंवा शिखर धवन हेच आधारस्तंभ ठरत होते. ज्या पद्धतीने शिखर बाद झाला ते वेदनादायी होते. त्याने विराटचा आदर्श बाळगायला हवा. मोठी खेळी त्याने उभारायला हवी.
भारताची मधली फळी ही माझ्यादृष्टीने चिंताजनक बाब आहे. कारण जर वरची फळी अपयशी ठरली तर आपले काय होणार, हा प्रश्न सतावत राहतो. फिरकी गोलंदाज हे संघाचा प्रमुख भाग आहेत. कुलदीप आणि चहल यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केलेली आहे. वनडे मालिकेचे सारे चित्र या दोघांनी बदलून टाकले.
दक्षिण आफ्रिकेचा भर प्रामुख्याने डीव्हिलियर्स आणि अमला यांच्यावरच आहे. हे दोघेच चहल आणि कुलदीप यांच्या गोलंदाजीचा अंदाज अचूक बांधू शकतात. बाकी फलंदाजांना त्यात अपयश येते. कारण हे दोघे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.
विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळविलेला हा नितांतसुंदर असा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेतच पराभूत केल्यामिुळे या विजयाला वेगळे महत्त्व प्राप्त होते. कर्णधाराने पुन्हा एकदा आघाडीवर राहात आपली कामगिरी चोख बजावली आहे. मग ती फलंदाजी असो की, गोलंदाजी किंवा नेतृत्व. आपल्याला जिंकण्यासाठी खेळायचे आहे, हेच विराटच्या खेळातून दिसून येत होते. रोहित शर्माची खेळी ही वैशिष्ट्यपूर्ण होती. या दौऱ्यात आधी रोहित शर्माला जे चेंडू खेळताना अडचण जाणवत होती, ती आता दूर झाल्यासारखी दिसते आहे. सलामीला येत एका मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची ताकद रोहितमध्ये आहे. आघाडीच्या फळीतील कुणीतरी उभे राहण्याची गरज होती आणि रोहितने ती पूर्ण केली. आतापर्यंतच्या वनडे लढतीत विराट किंवा शिखर धवन हेच आधारस्तंभ ठरत होते. ज्या पद्धतीने शिखर बाद झाला ते वेदनादायी होते. त्याने विराटचा आदर्श बाळगायला हवा. मोठी खेळी त्याने उभारायला हवी.
भारताची मधली फळी ही माझ्यादृष्टीने चिंताजनक बाब आहे. कारण जर वरची फळी अपयशी ठरली तर आपले काय होणार, हा प्रश्न सतावत राहतो. फिरकी गोलंदाज हे संघाचा प्रमुख भाग आहेत. कुलदीप आणि चहल यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केलेली आहे. वनडे मालिकेचे सारे चित्र या दोघांनी बदलून टाकले.
दक्षिण आफ्रिकेचा भर प्रामुख्याने डीव्हिलियर्स आणि अमला यांच्यावरच आहे. हे दोघेच चहल आणि कुलदीप यांच्या गोलंदाजीचा अंदाज अचूक बांधू शकतात. बाकी फलंदाजांना त्यात अपयश येते. कारण हे दोघे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.