अ‍ॅपशहर

adelaide test: फलंदाजांनी संयम दाखवावा, विराटनं सुनावलं!

पहिल्या डावात भारताने अपेक्षित फलंदाजी केली नाही, याची आठवण भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वांना करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आगामी कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाजांनी आणखी संयम दाखवायला हवा, हे सांगायला तो विसरला नाही.

PTI 11 Dec 2018, 2:52 am
अॅडलेड : पहिल्या डावात भारताने अपेक्षित फलंदाजी केली नाही, याची आठवण भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वांना करून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आगामी कसोटी सामन्यांत भारतीय फलंदाजांनी आणखी संयम दाखवायला हवा, हे सांगायला तो विसरला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the batsmen should show patience says virat kohli
adelaide test: फलंदाजांनी संयम दाखवावा, विराटनं सुनावलं!


पहिल्या डावात भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली होती पण चेतेश्वर पुजाराने चिवट फलंदाजी आणि शतकी खेळी करून भारताला सावरले होते. विराट म्हणाला की, पहिल्या डावात आम्ही संयमी फलंदाजी केली नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना वरचढ ठरण्याची संधी मिळाली. जर तुम्ही (भारतीय फलंदाज) जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर राहाल तसा कुकाबुरा चेंडू नरम पडत जातो आणि तो खेळणे मग सोपे बनत जाते. विराटने के.एल. राहुलच्या ४४ धावांच्या खेळीचेही कौतुक केले. ३२३ धावांमध्ये त्याचे हे योगदान मोलाचे होते. या सामन्यातील कामगिरीमुळे प्रत्येकालाच अभिमान वाटत असेल पण जर संधी मिळाली तर ४० धावांचे रूपांतर शतकात करण्याची तयारी ठेवा.

कडवी झुंज दिली

ऑस्ट्रेलियाचा कप्तान टीम पेन म्हणाला की, हा पराभव पचवणे सहज शक्य नाही पण आम्ही पाचव्या दिवसापर्यंत जी चिवट झुंज दिली त्यातून प्रेरणा घेऊन आगामी सामन्यांत झुंज देऊ. या आव्हानापेक्षा आणखी काय कठीण असू शकते? त्यामुळे ही मालिका अशीच आव्हानात्मक होईल, हीच अपेक्षा होती. आम्ही भारताला सहज विजय मिळू दिला नाही. त्यांनाही आम्हाला नमविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पुढील सामन्यासाठीही हाच संघ कायम राहील आणि आम्ही नव्या विश्वासाने खेळू.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज