वृत्तसंस्था, लंडन
इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिका खिशात टाकणाऱ्या भारताने वनडे मालिकेची सुरुवातही विजयाने केली. तीन वनडेंच्या मालिकेतील दुसरी वनडे आज, शनिवारी क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसवर रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या वनडेत भारताने इंग्लंडवर ८ विकेटनी सहज मात केली आहे. तेव्हा दुसरी लढत जिंकून इंग्लंड दौऱ्यात भारताला आणखी एक मालिका विजय मिळवण्याची संधी आहे.
पहिल्या वनडेत जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. मधल्या फळीतील बेन स्टोक्स आणि जोस बटलरने अर्धशतके टोकल्याने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने २५ धावांत ६ बळी मिळवले. यानंतर भारताने विजयी लक्ष्य ४०.१ षटकांतच पूर्ण केले. यात रोहित शर्माने ११४ चेंडूंत नाबाद १३७ धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीने ७५ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. रोहित शर्माला चांगला सूर गवसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२०तही त्याने शतक ठोकले होते.
पहिल्या लढतीतील विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र, मायदेशातील पराभव टाळण्यासाठी इंग्लंड आटोकाट प्रयत्न करणार, यात वादच नाही. तेव्हा भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. मागील म्हणजे २०१४च्या इंग्लंड दौऱ्यातही भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकली होती. तेव्हा इंग्लंडमध्ये सलग दुसरा मालिका विजय मिळवण्याची भारताला संधी आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून म्हणजे जानेवारी २०१६ पासून भारतीय संघ द्विपक्षीय वनडे मालिकेत अपराजित आहे. दरम्यान, इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. त्याचबरोबर लॉर्ड्सची खेळपट्टी काय कमाल दाखविते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
दुसरीकडे, इंग्लंडच्या क्रीडाप्रेमींसाठी शनिवारचा दिवस महत्त्वाचा आहे. क्रिकेटप्रेमींचे भारताविरुद्धच्या वनडेकडे लक्ष्य असेल, तर फुटबॉलप्रेमींचे बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या प्ले-ऑफ लढतीकडे.
दृष्टीकोन
१)कुलदीप यादवच्या फिरकीचा सामना करण्याची ताकद सध्या तरी इंग्लंडच्या फलंदाजांकडे नाही. ते फिरकीचा सरावदेखील स्पिन गोलंदाजीची मशीन 'मर्लिन'च्या सहाय्यानेच करतात.
२)विशेष म्हणजे भारत व इंग्लंड या दोन्ही संघाचे लंडनला आगमन झाले ते शुक्रवारी. त्यामुळे इंग्लंडला आपल्या कमकुवत दुव्यांवर मेहनत घेण्यासाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही. ज्यामुळे कुलदीपचे व्हीडिओ बघून तोडगा काढण्याचा वेळ त्यांना मिळालेला नाही.
इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिका खिशात टाकणाऱ्या भारताने वनडे मालिकेची सुरुवातही विजयाने केली. तीन वनडेंच्या मालिकेतील दुसरी वनडे आज, शनिवारी क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसवर रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या वनडेत भारताने इंग्लंडवर ८ विकेटनी सहज मात केली आहे. तेव्हा दुसरी लढत जिंकून इंग्लंड दौऱ्यात भारताला आणखी एक मालिका विजय मिळवण्याची संधी आहे.
पहिल्या वनडेत जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. मात्र, यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. मधल्या फळीतील बेन स्टोक्स आणि जोस बटलरने अर्धशतके टोकल्याने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने २५ धावांत ६ बळी मिळवले. यानंतर भारताने विजयी लक्ष्य ४०.१ षटकांतच पूर्ण केले. यात रोहित शर्माने ११४ चेंडूंत नाबाद १३७ धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीने ७५ धावांची खेळी करून चांगली साथ दिली. रोहित शर्माला चांगला सूर गवसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२०तही त्याने शतक ठोकले होते.
पहिल्या लढतीतील विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र, मायदेशातील पराभव टाळण्यासाठी इंग्लंड आटोकाट प्रयत्न करणार, यात वादच नाही. तेव्हा भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. मागील म्हणजे २०१४च्या इंग्लंड दौऱ्यातही भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकली होती. तेव्हा इंग्लंडमध्ये सलग दुसरा मालिका विजय मिळवण्याची भारताला संधी आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून म्हणजे जानेवारी २०१६ पासून भारतीय संघ द्विपक्षीय वनडे मालिकेत अपराजित आहे. दरम्यान, इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. त्याचबरोबर लॉर्ड्सची खेळपट्टी काय कमाल दाखविते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
दुसरीकडे, इंग्लंडच्या क्रीडाप्रेमींसाठी शनिवारचा दिवस महत्त्वाचा आहे. क्रिकेटप्रेमींचे भारताविरुद्धच्या वनडेकडे लक्ष्य असेल, तर फुटबॉलप्रेमींचे बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या प्ले-ऑफ लढतीकडे.
दृष्टीकोन
१)कुलदीप यादवच्या फिरकीचा सामना करण्याची ताकद सध्या तरी इंग्लंडच्या फलंदाजांकडे नाही. ते फिरकीचा सरावदेखील स्पिन गोलंदाजीची मशीन 'मर्लिन'च्या सहाय्यानेच करतात.
२)विशेष म्हणजे भारत व इंग्लंड या दोन्ही संघाचे लंडनला आगमन झाले ते शुक्रवारी. त्यामुळे इंग्लंडला आपल्या कमकुवत दुव्यांवर मेहनत घेण्यासाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही. ज्यामुळे कुलदीपचे व्हीडिओ बघून तोडगा काढण्याचा वेळ त्यांना मिळालेला नाही.