अ‍ॅपशहर

पाक लढतीचा निर्णय सरकारच्या हातात

'जोपर्यंत सरकारकडून आम्हाला परवानगी मिळत नाही, तोवर पाकिस्ताविरुद्ध आम्ही खेळणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी घेतली.

महाराष्ट्र टाइम्स 21 Feb 2019, 12:00 am
क्रिकेट वर्ल्डकप लढतीबाबत राजीव शुक्ला यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the decision of pakistan to be fought in the hands of the government
पाक लढतीचा निर्णय सरकारच्या हातात


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

'जोपर्यंत सरकारकडून आम्हाला परवानगी मिळत नाही, तोवर पाकिस्ताविरुद्ध आम्ही खेळणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी घेतली.

नुकताच पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर भीषण आत्मघातली हल्ला करण्यात आला. यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवर भारतीय क्रिकेट संघाने बहिष्कार टाकावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'मागील दहा वर्षांचे आमचे धोरण राहिले आहे, की सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही पाकिस्तानात जात नाहीत आणि पाकिस्तानला भारतात येण्याची परवानगी नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.' आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र भारताला आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणे बंधनकारक आहे. अर्थात, आयसीसीने भारत-पाकिस्तानमधील १६ जून रोजी मँचेस्टर येथे होणारी लढत ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शुक्ला म्हणाले, 'खरे तर खेळाला राजकारणात आणले जाऊ नये, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जर कोणी दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल, तर त्याचा परिणाम खेळावरही होईलच. आता वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेला अद्याप बराच कालावधी आहे. बघूयात काय होते, ते.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज