शास्त्री यांचे मत
वृत्तसंस्था, लंडन
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा होता, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे.
पावसामुळे दुसऱ्या दिवशीही खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखले होते. पण या फारशा कठीण न वाटणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला १८ धावा कमी पडल्या. भारताचे आघाडीचे फलंदाज अवघ्या २४ धावांत गारद झाले. मॅट हेन्रीने ३७ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद करून भारताच्या या पडझडीला हातभार लावला.
पण नंतर रवींद्र जाडेजा (७७) आणि महेंद्रसिंग धोनी (५०) यांनी ११६ धावांची भागीदारी करून भारताला पराभवापासून वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न तोकडे ठरले.
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत तर पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकला पाठविण्यात आले. त्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला. पंड्यानंतर धोनीला पाठविण्यात आले. त्यावरून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
रवी शास्त्री यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा होता. सगळ्यांचा त्याला पाठिंबा होता आणि तो अत्यंत सर्वसाधारण असा निर्णय होता. जर धोनी आधीच्या क्रमांकावर फलंदाजीस आला असता आणि बाद झाला असता तर आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकलो नसतो. आम्हाला त्याच्या अनुभवाचा नंतरच फायदा होऊ शकला असता. सामन्याचा निकाल फिरविण्याची ताकद त्याच्यापाशी आहे. त्यामुळे त्याच्या त्या क्षमतेचा उपयोग करून न घेणे हा गुन्हाच ठरला असता. संपूर्ण संघाचे धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याबाबत एकमत होते.
या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ संभाव्य विजेता म्हणून ओळखला जात होता. ९ पैकी ७ सामने भारताने जिंकले आणि शेवटी पहिल्या चार संघांत अव्वलस्थानही मिळविले. त्यामुळे भारताकडून विजेतेपदाच्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. इंग्लंडकडून त्यांना हार मानावी लागली तरीही त्यांनी हे अव्वलस्थान मिळविले. मात्र उपांत्य फेरीत सारे चित्रच बदलले. जवळपास ३० मिनिटे केलेल्या खराब खेळाचा भारताला फटका बसल्याचे बोलले गेले. पण या खेळावरून भारतीय संघाची क्षमता तोलणे योग्य ठरणार नाही, असे रवी शास्त्री, कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहित शर्माचे मत होते.
शास्त्री त्याबद्दल म्हणाले की, भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे. गेली काही वर्षे भारतीय संघाने जो दबदबा निर्माण केला आहे, तो या ३० मिनिटांच्या खराब खेळामुळे नाकारला जाऊ शकत नाही. भारतीय संघाला हार सहन करावी लागली, याचे दुःख आहे, तरीही गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीता अभिमानही वाटतो.
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबद्दल गेले अनेक दिवस चर्चा होती. त्याबद्दल शास्त्री यांना विचारल्यावर ते म्हणाले की, हो हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे आणि भविष्यात त्याजागी उत्कृष्ट फलंदाजाची आपल्याला गरज आहे. चौथ्या क्रमांकाने नेहमीच भारताला संत्रस्त केले आहे. यावेळी के.एल. राहुल चौथ्या क्रमांकावर खेळत होता पण शिखर धवनला दुखापत झाली आणि नंतर विजय शंकरलाही दुखापतीमुळे खेळता आले नाही. यावर आमचे कोणतेही नियंत्रण नव्हते.
शास्त्री शेवटी म्हणाले की, हा भारतीय संघ योग्य मार्गावर आहे. या संघातील काही तरुण फलंदाजांमुळे तो आणखी बळकट होईल.
वृत्तसंस्था, लंडन
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा होता, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे.
पावसामुळे दुसऱ्या दिवशीही खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखले होते. पण या फारशा कठीण न वाटणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला १८ धावा कमी पडल्या. भारताचे आघाडीचे फलंदाज अवघ्या २४ धावांत गारद झाले. मॅट हेन्रीने ३७ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद करून भारताच्या या पडझडीला हातभार लावला.
पण नंतर रवींद्र जाडेजा (७७) आणि महेंद्रसिंग धोनी (५०) यांनी ११६ धावांची भागीदारी करून भारताला पराभवापासून वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न तोकडे ठरले.
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत तर पाचव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकला पाठविण्यात आले. त्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला. पंड्यानंतर धोनीला पाठविण्यात आले. त्यावरून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
रवी शास्त्री यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाचा होता. सगळ्यांचा त्याला पाठिंबा होता आणि तो अत्यंत सर्वसाधारण असा निर्णय होता. जर धोनी आधीच्या क्रमांकावर फलंदाजीस आला असता आणि बाद झाला असता तर आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकलो नसतो. आम्हाला त्याच्या अनुभवाचा नंतरच फायदा होऊ शकला असता. सामन्याचा निकाल फिरविण्याची ताकद त्याच्यापाशी आहे. त्यामुळे त्याच्या त्या क्षमतेचा उपयोग करून न घेणे हा गुन्हाच ठरला असता. संपूर्ण संघाचे धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याबाबत एकमत होते.
या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ संभाव्य विजेता म्हणून ओळखला जात होता. ९ पैकी ७ सामने भारताने जिंकले आणि शेवटी पहिल्या चार संघांत अव्वलस्थानही मिळविले. त्यामुळे भारताकडून विजेतेपदाच्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. इंग्लंडकडून त्यांना हार मानावी लागली तरीही त्यांनी हे अव्वलस्थान मिळविले. मात्र उपांत्य फेरीत सारे चित्रच बदलले. जवळपास ३० मिनिटे केलेल्या खराब खेळाचा भारताला फटका बसल्याचे बोलले गेले. पण या खेळावरून भारतीय संघाची क्षमता तोलणे योग्य ठरणार नाही, असे रवी शास्त्री, कर्णधार विराट आणि उपकर्णधार रोहित शर्माचे मत होते.
शास्त्री त्याबद्दल म्हणाले की, भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे. गेली काही वर्षे भारतीय संघाने जो दबदबा निर्माण केला आहे, तो या ३० मिनिटांच्या खराब खेळामुळे नाकारला जाऊ शकत नाही. भारतीय संघाला हार सहन करावी लागली, याचे दुःख आहे, तरीही गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीता अभिमानही वाटतो.
चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबद्दल गेले अनेक दिवस चर्चा होती. त्याबद्दल शास्त्री यांना विचारल्यावर ते म्हणाले की, हो हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे आणि भविष्यात त्याजागी उत्कृष्ट फलंदाजाची आपल्याला गरज आहे. चौथ्या क्रमांकाने नेहमीच भारताला संत्रस्त केले आहे. यावेळी के.एल. राहुल चौथ्या क्रमांकावर खेळत होता पण शिखर धवनला दुखापत झाली आणि नंतर विजय शंकरलाही दुखापतीमुळे खेळता आले नाही. यावर आमचे कोणतेही नियंत्रण नव्हते.
शास्त्री शेवटी म्हणाले की, हा भारतीय संघ योग्य मार्गावर आहे. या संघातील काही तरुण फलंदाजांमुळे तो आणखी बळकट होईल.