अ‍ॅपशहर

शेष भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे

मुंबईचा अजिंक्य रहाणे रणजी विजेत्या विदर्भविरुद्ध होणाऱ्या इराणी करंडक सामन्यासाठी शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ही लढत नागपुरात खेळविली जाणार आहे.

PTI 8 Feb 2019, 7:12 am
नवी दिल्ली : मुंबईचा अजिंक्य रहाणे रणजी विजेत्या विदर्भविरुद्ध होणाऱ्या इराणी करंडक सामन्यासाठी शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ही लढत नागपुरात खेळविली जाणार आहे. त्यानंतर कसोटीपटू के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध वायनाड येथे अनौपचारिक कसोटी खेळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajinkya-rahane


इराणी सामन्यासाठी शेष भारत संघात नामांकित फलंदाजांची फळी पाहायला मिळते. त्यात मयांक अगरवाल, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, इशान किशन व कृष्णप्पा गौतम यांचा समावेश आहे. सौराष्ट्रचा स्नेल पटेल, धर्मेंद्र जाडेजा हेदेखील शेष भारत संघात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज