म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर
आयुष्यातील आव्हाने बरेचदा एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी सर्वोत्तम घडवून आणतात. विदर्भ रणजी संघाचा अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटेच्या बाबतीत असे म्हणता येईल. आदित्यची कथा प्रेरणादायी अशीच आहे. विदर्भ संघाच्या या अष्टपैलू खेळाडूने विदर्भ क्रिकेट संघाला दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावत अवघ्या क्रिकेटजगताचे लक्ष्य वेधून घेतले आहे. मात्र, आदित्यचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे.
विदर्भ संघाने गेल्यावर्षी पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, त्यावेळी आदित्य संघाच्या प्रमुख शिलेदारांपैकी एक होता. यंदा दुसऱ्या हंगामातही आदित्यने उत्कृष्ट कामगिरी केली. डावखुरा फिरकीपटू व फलंदाज असलेल्या आदित्यने ११ सामने खेळत ५५ बळी मिळविले. एकाच हंगामात विदर्भाच्या गोलंदाजाने इतके खेळाडू बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नव्हे, तर सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यानंतर आदित्यने दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना व सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले असताना ४९ धावांची चिवट खेळी करीत प्रतिस्पर्धी संघापुढे एक कठीण लक्ष्य दिले. तर, दुसऱ्या डावातही सहा गडी बाद करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा प्रमुख विजयी शिलेदार व सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत सरवटेनेच बाद करीत संघाला मोठे यश मिळवून दिले. या स्वप्नवत प्रवासापूर्वी अनेक अडचणी, कठीण परिस्थितींना तोंड देत आदित्य इथपर्यंत पोहेचला आहे.
आघात सोसले तरी...
सुमारे २० वर्षांपूर्वी आदित्य व त्याच्या कुटुंबीयांच्या आयुष्यावर मोठा आघात झाला. आदित्यचे वडील आनंद सरवटे मुंबईला गेले असता अपघातग्रस्त झाले. या अपघातामुळे ते कोमात गेले. मात्र, कोमातून बाहेर गेल्यावर शरीराला अर्धांगवायू झाल्याने ते अंथरुणावरच खिळून राहिले. त्यामुळे अतिशय लहान वयातच आदित्यवर वडिलांना सांभाळण्याची जबाबादारी आली. कारण, वडील घरीच असल्याने प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी आई अनुश्री यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली. आई नोकरी करीत असल्याने साहजिकच वडिलांची शुश्रूषा करण्याची जबाबदारी आदित्यवर आली. असे असतानाही आदित्यने कधीही न डगमगता सर्व जबाबदाऱ्या नीट सांभाळल्या.
आई, काहीतरी वेगळे करायचेय!
क्रिकेटची मुळातच आवड असलेल्या आदित्यने घरच्या जबाबदाऱ्यांचा खेळावरही कधीही परिणाम होऊ दिला नाही. खेळासोबतच अभ्यासातही त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे या सर्व प्रवासात घरचे भक्कमपणे आदित्यच्या पाठीशी उभे राहिले. आदित्यचे आजोबा व आकाशवाणीचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक श्याम सरवटे यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली. घर सांभाळण्यासाठी आदित्यला अनेकदा 'नोकरी कर' म्हणणाऱ्या आई अनुश्री यांना प्रत्येकवेळी आदित्यने 'काही वेगळे करायचे आहे', असे सांगितले. त्यांनी आदित्यला साथ दिली. त्यामुळे आज आदित्यला इतका मोठा पल्ला गाठता आला. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर सध्या त्याचाच बोलबाला सुरू आहे.
आयुष्यातील आव्हाने बरेचदा एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी सर्वोत्तम घडवून आणतात. विदर्भ रणजी संघाचा अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटेच्या बाबतीत असे म्हणता येईल. आदित्यची कथा प्रेरणादायी अशीच आहे. विदर्भ संघाच्या या अष्टपैलू खेळाडूने विदर्भ क्रिकेट संघाला दुसऱ्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावत अवघ्या क्रिकेटजगताचे लक्ष्य वेधून घेतले आहे. मात्र, आदित्यचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे.
विदर्भ संघाने गेल्यावर्षी पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, त्यावेळी आदित्य संघाच्या प्रमुख शिलेदारांपैकी एक होता. यंदा दुसऱ्या हंगामातही आदित्यने उत्कृष्ट कामगिरी केली. डावखुरा फिरकीपटू व फलंदाज असलेल्या आदित्यने ११ सामने खेळत ५५ बळी मिळविले. एकाच हंगामात विदर्भाच्या गोलंदाजाने इतके खेळाडू बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नव्हे, तर सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यानंतर आदित्यने दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना व सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले असताना ४९ धावांची चिवट खेळी करीत प्रतिस्पर्धी संघापुढे एक कठीण लक्ष्य दिले. तर, दुसऱ्या डावातही सहा गडी बाद करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा प्रमुख विजयी शिलेदार व सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांत सरवटेनेच बाद करीत संघाला मोठे यश मिळवून दिले. या स्वप्नवत प्रवासापूर्वी अनेक अडचणी, कठीण परिस्थितींना तोंड देत आदित्य इथपर्यंत पोहेचला आहे.
आघात सोसले तरी...
सुमारे २० वर्षांपूर्वी आदित्य व त्याच्या कुटुंबीयांच्या आयुष्यावर मोठा आघात झाला. आदित्यचे वडील आनंद सरवटे मुंबईला गेले असता अपघातग्रस्त झाले. या अपघातामुळे ते कोमात गेले. मात्र, कोमातून बाहेर गेल्यावर शरीराला अर्धांगवायू झाल्याने ते अंथरुणावरच खिळून राहिले. त्यामुळे अतिशय लहान वयातच आदित्यवर वडिलांना सांभाळण्याची जबाबादारी आली. कारण, वडील घरीच असल्याने प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी आई अनुश्री यांच्यावर आली. त्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली. आई नोकरी करीत असल्याने साहजिकच वडिलांची शुश्रूषा करण्याची जबाबदारी आदित्यवर आली. असे असतानाही आदित्यने कधीही न डगमगता सर्व जबाबदाऱ्या नीट सांभाळल्या.
आई, काहीतरी वेगळे करायचेय!
क्रिकेटची मुळातच आवड असलेल्या आदित्यने घरच्या जबाबदाऱ्यांचा खेळावरही कधीही परिणाम होऊ दिला नाही. खेळासोबतच अभ्यासातही त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे या सर्व प्रवासात घरचे भक्कमपणे आदित्यच्या पाठीशी उभे राहिले. आदित्यचे आजोबा व आकाशवाणीचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक श्याम सरवटे यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली. घर सांभाळण्यासाठी आदित्यला अनेकदा 'नोकरी कर' म्हणणाऱ्या आई अनुश्री यांना प्रत्येकवेळी आदित्यने 'काही वेगळे करायचे आहे', असे सांगितले. त्यांनी आदित्यला साथ दिली. त्यामुळे आज आदित्यला इतका मोठा पल्ला गाठता आला. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर सध्या त्याचाच बोलबाला सुरू आहे.