वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा एकेकाळचा तडाखेबंद फलंदाज वीरेंदर सेहवाग हार्दिक पंड्यावर भलताच खुश आहे. हार्दिकसारख्या खेळाडूची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे कौतुकोद्गार तो काढतो.
आयपीएलच्या विजेत्या संघाचा म्हणजे मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ असलेल्या हार्दिकच्या जवळपासही कुणी पोहोचू शकत नाही, असे सेहवागचे म्हणणे आहे. एका टीव्ही शोदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हार्दिक आणि के.एल. राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशी पाठविण्यात आले होते. या संकटातून बाहेर पडलेला हार्दिक आयपीएलमध्ये चमकला. त्याने १५ सामन्यांत ४०२ धावा केल्या. त्यात ९१ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याबद्दल सेहवाग म्हणतो की, जर हार्दिकच्या जवळपास जाणारा एखादा जरी खेळाडू असता तर त्याला संघात स्थान मिळविणे कठीण गेले असते.
आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला सर्वाधिक आशा आहेत त्या हार्दिककडून. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता अन्य कोणत्याही खेळाडूकडे सध्या नाही, असे सेहवागला वाटते.
भारताचा एकेकाळचा तडाखेबंद फलंदाज वीरेंदर सेहवाग हार्दिक पंड्यावर भलताच खुश आहे. हार्दिकसारख्या खेळाडूची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असे कौतुकोद्गार तो काढतो.
आयपीएलच्या विजेत्या संघाचा म्हणजे मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ असलेल्या हार्दिकच्या जवळपासही कुणी पोहोचू शकत नाही, असे सेहवागचे म्हणणे आहे. एका टीव्ही शोदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हार्दिक आणि के.एल. राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशी पाठविण्यात आले होते. या संकटातून बाहेर पडलेला हार्दिक आयपीएलमध्ये चमकला. त्याने १५ सामन्यांत ४०२ धावा केल्या. त्यात ९१ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याबद्दल सेहवाग म्हणतो की, जर हार्दिकच्या जवळपास जाणारा एखादा जरी खेळाडू असता तर त्याला संघात स्थान मिळविणे कठीण गेले असते.
आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला सर्वाधिक आशा आहेत त्या हार्दिककडून. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता अन्य कोणत्याही खेळाडूकडे सध्या नाही, असे सेहवागला वाटते.