अ‍ॅपशहर

भारत वि. वेस्ट इंडिज: पहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यावेळी राजस्थान संघातील तीन खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर, राहुल चाहर आणि खलील अहमद अशी या तिघांची नावं असून हे तिघंही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

Mandakini Shalya | TNN 22 Jul 2019, 10:24 am
जयपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three players of rajasthan given opportunity to play in indian cricket team
भारत वि. वेस्ट इंडिज: पहिल्यांदाच राजस्थानच्या तीन खेळाडूंचा संघात समावेश


वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यावेळी राजस्थान संघातील तीन खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. दीपक चाहर, राहुल चाहर आणि खलील अहमद अशी या तिघांची नावं असून हे तिघंही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

राहुल हा फिरकी गोलंदाज आहे तर दीपक आणि खलील वेगवान गोलंदाज आहेत. ' भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. बराच काळ मला भारतीय संघात खेळण्याची इच्छा आहे. यामुळे याकडे मी एक मोठी संधी म्हणून पाहतो आहे'.
अशी माहिती खलील अहमदने दिली आहे. अॅंटीग्वा येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारतीय संघाच्या टीम एमध्ये खलील अहमदला समाविष्ट करण्यात आलं आहे.

तर दीपक आणि राहुल भावंडं असून त्यांच्या मोठ्या बहिणीने दोघांचे कौतुक केलं आहे. ' दोन्ही भावंडांची संघात निवड होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.' असं मालती चाहर हिने सांगितलं. दीपकच्या वडिलांची आग्रा येथे क्रिकेट अकॅडेमी आहे.

राजस्थानची क्रिकेट समिती बीसीसीआयने बरखास्त केली असतानाच राजस्थानच्या तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज