नवी दिल्ली :
भारताचा चमकता तारा मनजोत कालराने अंडर-१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तडाखेबंद शतक झळकावलं. त्याने ८ चौकार आणि तीन खणखणीत षटकाराच्या साथीनं शतकी खेळी करत भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्याच्या या निर्णायक खेळीचे सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात मनजोतला क्रिकेटर होण्यास त्याच्या आईने सर्वप्रथम विरोध केला होता. आज मात्र क्रिकेटपटू म्हणून मुलगा नावारुपाला आला म्हणून त्याच्या आई-वडिलांना आभाळ ठेंगण झालंय.
मनजोत हा दिल्लीचा असून युवा भारतीय संघातील दिल्लीतील तो एकमेव खेळाडू आहे. तो दिल्लीच्या आझादपूर मंडईत राहतो. त्याचे वडील प्रवीण कुमार व्यापारी आहेत. मुलाने अभ्यास करावा आणि शिक्षण घेऊनच पुढचं आयुष्य जगावं असं त्याच्या कुटुंबीयांना वाटत होतं. तो अभ्यासात हुशार होता. त्यामुळे तो उच्च शिक्षण घेईल असं आम्हाला वाटत होतं, असं त्याच्या वडिलाने सांगितलं. मनजोतच्या मोठ्या भावालाही क्रिकेटचं वेड होतं. तो त्याच्या भावासोबत क्रिकेट खेळायचा. त्यामुळे क्रिकेट विषयी त्याचं एवढं प्रेम वाढलं की पुढे त्यानं क्रिकेटमध्येच करियर करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा चमकता तारा मनजोत कालराने अंडर-१९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तडाखेबंद शतक झळकावलं. त्याने ८ चौकार आणि तीन खणखणीत षटकाराच्या साथीनं शतकी खेळी करत भारताला विश्वचषक जिंकून दिला. त्याच्या या निर्णायक खेळीचे सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात मनजोतला क्रिकेटर होण्यास त्याच्या आईने सर्वप्रथम विरोध केला होता. आज मात्र क्रिकेटपटू म्हणून मुलगा नावारुपाला आला म्हणून त्याच्या आई-वडिलांना आभाळ ठेंगण झालंय.
मनजोत हा दिल्लीचा असून युवा भारतीय संघातील दिल्लीतील तो एकमेव खेळाडू आहे. तो दिल्लीच्या आझादपूर मंडईत राहतो. त्याचे वडील प्रवीण कुमार व्यापारी आहेत. मुलाने अभ्यास करावा आणि शिक्षण घेऊनच पुढचं आयुष्य जगावं असं त्याच्या कुटुंबीयांना वाटत होतं. तो अभ्यासात हुशार होता. त्यामुळे तो उच्च शिक्षण घेईल असं आम्हाला वाटत होतं, असं त्याच्या वडिलाने सांगितलं. मनजोतच्या मोठ्या भावालाही क्रिकेटचं वेड होतं. तो त्याच्या भावासोबत क्रिकेट खेळायचा. त्यामुळे क्रिकेट विषयी त्याचं एवढं प्रेम वाढलं की पुढे त्यानं क्रिकेटमध्येच करियर करण्याचा निर्णय घेतला.