वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेतील पहिल्या तीन वनडेंसाठी रविवारी जाहीर झालेल्या भारतीय संघात फक्त शार्दूल ठाकूर यालाच संधी मिळालेली नाही. त्याचा अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यावरील वनडे संघच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. अश्विन व रवींद्र जाडेजा यांना पहिल्या तीन वनडेंसाठी संघात संधी नाही. त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआय व निवड समितीकडून सांगण्यात येते आहे. मात्र यात शंकेचा मुद्दा उपस्थित होतो की, विश्रांती दिली असेल तर मग अश्विन कौंटी क्रिकेट तर खेळणारच आहे.
गेल्या चार सामन्यांमध्ये फक्त ६४ धावा करणाऱ्या केदार जाधवच्या समावेशाबाबत साशंकता होती; पण त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत संधी देण्यात आली आहे. ‘गेले चार सामने सोडल्यास केदारने आधीच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आपल्या उपयुक्त स्पिन गोलंदाजीने त्या मोक्याच्या क्षणी भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिले आहेत. पडत्या काळात आपण अशा खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे’, असे एका सुत्राने टाइम्स समुहाला सांगितले.
क्षणचित्रे
१- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेंसाठी अश्विन व रवींद्र जाडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.
२- अश्विन कौंटी क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्याला संघात न घेण्याचे कारण विश्रांती हे कसे असू शकते असा प्रश्न उपस्थित होतो.
३- श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या शार्दूल ठाकूरलाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिली गेलेली नाही.
४- चेन्नईत १७ सप्टेंबरला रंगणाऱ्या वनडेद्वारे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होईल.
भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेतील पहिल्या तीन वनडेंसाठी रविवारी जाहीर झालेल्या भारतीय संघात फक्त शार्दूल ठाकूर यालाच संधी मिळालेली नाही. त्याचा अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यावरील वनडे संघच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. अश्विन व रवींद्र जाडेजा यांना पहिल्या तीन वनडेंसाठी संघात संधी नाही. त्यांना विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआय व निवड समितीकडून सांगण्यात येते आहे. मात्र यात शंकेचा मुद्दा उपस्थित होतो की, विश्रांती दिली असेल तर मग अश्विन कौंटी क्रिकेट तर खेळणारच आहे.
गेल्या चार सामन्यांमध्ये फक्त ६४ धावा करणाऱ्या केदार जाधवच्या समावेशाबाबत साशंकता होती; पण त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत संधी देण्यात आली आहे. ‘गेले चार सामने सोडल्यास केदारने आधीच्या सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आपल्या उपयुक्त स्पिन गोलंदाजीने त्या मोक्याच्या क्षणी भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिले आहेत. पडत्या काळात आपण अशा खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे’, असे एका सुत्राने टाइम्स समुहाला सांगितले.
क्षणचित्रे
१- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेंसाठी अश्विन व रवींद्र जाडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.
२- अश्विन कौंटी क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्याला संघात न घेण्याचे कारण विश्रांती हे कसे असू शकते असा प्रश्न उपस्थित होतो.
३- श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या शार्दूल ठाकूरलाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिली गेलेली नाही.
४- चेन्नईत १७ सप्टेंबरला रंगणाऱ्या वनडेद्वारे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होईल.
भारतीय संघः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी.