अ‍ॅपशहर

उमेश यादव, शामीचं पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यात, टीम इंडियाचा जादुगार फिरकीपटू मानल्या जाणाऱ्या रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलेलं नाही.

Maharashtra Times 10 Sep 2017, 2:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम umesh shami return to india odi squad
उमेश यादव, शामीचं पुनरागमन


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यात, टीम इंडियाचा जादुगार फिरकीपटू मानल्या जाणाऱ्या रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलेलं नाही. तसंच, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना या शिलेदारांनाही निवड समितीने विश्रांतीच दिली आहे. याउलट, उमेश यादव आणि मोहम्मद शामी या जलदगती गोलंदाजांनी वनडे संघात पुनरागमन केलंय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका येत्या १७ सप्टेंबरपासून सुरू होतेय. ही लढाई दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवलं असलं तरी, यजमान संघ तुलनेनं दुबळा असल्यानं सगळेच सामने एकतर्फी झाले. पण, ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणं आव्हानात्मक आहे. स्वाभाविकच, या मालिकेसाठी संघ निवडताना, निवड समिती सगळ्याच रथी-महारथींना संधी देईल, अशी आशा होती. पण, अश्विन, जाडेजा आणि रैना या तिघांनाही संघाबाहेर ठेवून निवड समितीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी जो १५ जणांचा संघ निवडला होता, त्यातील एकट्या शार्दुल ठाकूरला वगळून बाकी १४ जणांना 'मिशन ऑस्ट्रेलिया'साठी कायम ठेवण्यात आलंय. नवा चेंडू हाताळण्यासाठी बुमराह आणि भुवीसोबत उमेश यादव आणि शामी या चौकडीची निवड केली आहे.

सध्या अश्विन इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळतो आहे. तिथे तो वूस्टरशायरचे प्रतिनिधित्व करतो. अश्विनचा त्यांच्याशी चार सामन्यांसाठी करार झाला असून त्यांचा अंतिम सामना २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. ही स्पर्धा अर्ध्यावर सोडून अश्विनला परत यावं लागू नये, म्हणूनच त्याला आत्ताच्या संघनिवडीत वगळल्याचं कळतं. त्याचप्रमाणे, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल सरस कामगिरी करत असल्याने निवड समितीने फिरकीची धुरा त्यांच्याच खांद्यावर ठेवलीय. श्रीलंकेतील वनडे सामन्यांमध्ये केदार जाधव फारशी समाधानकारक कामगिरी करू शकला नव्हता. पण, त्याला आणखी एक संधी देऊन त्याचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न निवड समितीनं केला आहे.

भारतीय संघ असाः

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शामी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज