बेंगळुरूः रायझिंग पुणे सुपरजायंट संघाविरुद्ध ख्रिस गेलला वगळून शेन वॉटसनला संघात स्थान देण्याचा निर्णय योग्यच असल्याचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा प्रशिक्षक डॅनिएल व्हिटोरी याने सांगितले. घरच्या मैदानावर खेळताना बेंगळुरू संघाला पुणे सुपरजायंटविरुद्ध २७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या लढतीत गेलला बेंगळुरू संघात स्थान देण्यात आले नव्हते. पुणे सुपरजायंट संघाने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरू संघाला ९ बाद १३४ धावाच करता आल्या.
ही लढत संपल्यानंतर व्हिटोरी म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीनंतर आमच्या असे लक्षात आले की एक गोलंदाज संघात कमी आहे. वॉटसनमुळे आम्हाला एक गोलंदाज तर मिळत होता, शिवाय फलंदाजही मिळत होता. तो टी-२०मधील एक चांगला अष्टपैलू आहे. त्यामुळेच गेलऐवजी वॉटसनला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला.’ वॉटसनला मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीत चमक दाखविण्यात अपयश आले. त्याने चार षटकांत ४४ धावा देत एक गडी बाद केला, तर १८ चेंडूंत केवळ १४ धावा केल्या. त्याच्या एका षटकात (१९व्या षटकात) मनीष तिवारीने तीन चौकार व एक षटकारसह १९ धावा वसूल केल्या. व्हिटोरी म्हणाला, ‘पहिल्या १८ षटकांत पुणे सुपरजायंटच्या फलंदाजांवर आम्ही अंकुश राखला होता. मात्र, शेवटच्या दोन षटकांत दिलेल्या ३० धावा महागात पडल्या. त्यामुळे धावफलकावर १५ धावा अधिकच्या लागल्या. यामुळे आमच्या संघावर दबाव वाढला.’
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या मोसमातील तीन लढती झाल्या. यातील एकच लढत बेंगळुरूला जिंकता आली, तर दोन लढतींत पराभव पत्करावा लागला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अद्याप धावांचा पाऊस पडलेला नाही. येथील खेळपट्टीमुळे संघांना मोठी धावसंख्या रचता आलेली नाही. याबाबत व्हिटोरी म्हणाला, ‘टी-२०साठीची ही वाईट खेळपट्टी आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. गोलंदाजांसाठी ही उत्तम खेळपट्टी आहे. आतापर्यंत झालेल्या लढतींनी चांगले मनोरंजन केले आहे. खेळपट्टी थोडी वेगळी असली, तरी येथील परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यावे लागेल.’
‘विजयात मोलाचा वाटा उचलल्याचा आनंद’
‘या लढतीत अनेक टर्निंग पॉइंट बघायला मिळालेत. अखेरच्या षटकांमधील माझी फटकेबाजी तेवढीच महत्त्वाची होती. माझ्या २७ धावांच्या खेळीने लढतीचे चित्रच पालटले. कारण मधल्या षटकांमध्ये आमचा डाव गडगडला होता. त्या वेळी आमची लढतीवरील पकड निसटली होती. अर्थात आघाडीच्या फलंदाजांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे होते. हा सांघिक विजय आहे; पण या विजयात मोलाचा वाटा उचलू शकलो, याचा आनंद आहे,’ असे पुणे सुपरजायंट संघाचा मनोज तिवारी म्हणाला. तिवारीने १९ चेंडूंत २७ धावा जोडल्या. एक वेळ पुणे सुपरजायंटची ७ बाद १३० अशी स्थिती होती. तिवारीच्या फटकेबाजीने पुणे सुपरजायंटला १६१ धावा फलकावर लावता आल्या.
ही लढत संपल्यानंतर व्हिटोरी म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीनंतर आमच्या असे लक्षात आले की एक गोलंदाज संघात कमी आहे. वॉटसनमुळे आम्हाला एक गोलंदाज तर मिळत होता, शिवाय फलंदाजही मिळत होता. तो टी-२०मधील एक चांगला अष्टपैलू आहे. त्यामुळेच गेलऐवजी वॉटसनला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला.’ वॉटसनला मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीत चमक दाखविण्यात अपयश आले. त्याने चार षटकांत ४४ धावा देत एक गडी बाद केला, तर १८ चेंडूंत केवळ १४ धावा केल्या. त्याच्या एका षटकात (१९व्या षटकात) मनीष तिवारीने तीन चौकार व एक षटकारसह १९ धावा वसूल केल्या. व्हिटोरी म्हणाला, ‘पहिल्या १८ षटकांत पुणे सुपरजायंटच्या फलंदाजांवर आम्ही अंकुश राखला होता. मात्र, शेवटच्या दोन षटकांत दिलेल्या ३० धावा महागात पडल्या. त्यामुळे धावफलकावर १५ धावा अधिकच्या लागल्या. यामुळे आमच्या संघावर दबाव वाढला.’
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या मोसमातील तीन लढती झाल्या. यातील एकच लढत बेंगळुरूला जिंकता आली, तर दोन लढतींत पराभव पत्करावा लागला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अद्याप धावांचा पाऊस पडलेला नाही. येथील खेळपट्टीमुळे संघांना मोठी धावसंख्या रचता आलेली नाही. याबाबत व्हिटोरी म्हणाला, ‘टी-२०साठीची ही वाईट खेळपट्टी आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. गोलंदाजांसाठी ही उत्तम खेळपट्टी आहे. आतापर्यंत झालेल्या लढतींनी चांगले मनोरंजन केले आहे. खेळपट्टी थोडी वेगळी असली, तरी येथील परिस्थितीशी पटकन जुळवून घ्यावे लागेल.’
‘विजयात मोलाचा वाटा उचलल्याचा आनंद’
‘या लढतीत अनेक टर्निंग पॉइंट बघायला मिळालेत. अखेरच्या षटकांमधील माझी फटकेबाजी तेवढीच महत्त्वाची होती. माझ्या २७ धावांच्या खेळीने लढतीचे चित्रच पालटले. कारण मधल्या षटकांमध्ये आमचा डाव गडगडला होता. त्या वेळी आमची लढतीवरील पकड निसटली होती. अर्थात आघाडीच्या फलंदाजांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे होते. हा सांघिक विजय आहे; पण या विजयात मोलाचा वाटा उचलू शकलो, याचा आनंद आहे,’ असे पुणे सुपरजायंट संघाचा मनोज तिवारी म्हणाला. तिवारीने १९ चेंडूंत २७ धावा जोडल्या. एक वेळ पुणे सुपरजायंटची ७ बाद १३० अशी स्थिती होती. तिवारीच्या फटकेबाजीने पुणे सुपरजायंटला १६१ धावा फलकावर लावता आल्या.