वृत्तसंस्था, इंदूर
विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी पहिल्या डावात २३३ धावांची भक्कम आघाडी घेतली असून, विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अक्षय वाडकरचे नाबाद शतक आणि आदित्य सरवटे व सिद्धेश नेरळ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५२८ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी विदर्भाने ४ बाद २०६ धावा करून चांगली सुरुवात केली होती. त्यावेळी वसिम जाफर ६१, तर अक्षय वखरे ० धावांवर खेळत होते. रविवारी पहिल्या १२ षटकांमध्येच विदर्भाने हे दोन्ही फलंदाज गमावले. नवदीप सैनीने प्रथम अक्षयला १७ धावांवर बाद केले व नंतर जाफरला पायचित पकडून विदर्भाची अवस्था ६ बाद २४६ अशी केली. जाफरने १५० चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ७८ धावा केल्या. त्या वेळी विदर्भ ४९ धावांनी पिछाडीवर होता आणि विदर्भाचा डाव लवकर गुंडाळून पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेण्याची दिल्लीला संधी होती. मात्र, विदर्भाचा यष्टीरक्षक अक्षय वाडकरने सरवटे आणि नेरळ यांच्यासह चिवट फलंदाजी करून दिल्लीचे मनसुभे उधळून लावले.
दिवसाच्या उर्वरित खेळात दिल्लीला केवळ एक विकेट मिळवता आली. वाडकर आणि सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी करून विदर्भाला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. सरवटे १५४ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ७९ धावा करून बाद झाला. त्यानंतर वाडकरने नेरळसोबत अभेद्य शतकी भागीदारी रचून दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, वाडकरने कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या शतकालाही गवसणी घातली. यंदाच्याच मोसमात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वाडकरचा हा पाचवाच रणजी सामना आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वाडकरने २४३ चेंडूंमध्ये १७ चौकार व एका षटकारांसह १३३ धावा केल्या होत्या, नेरळने ९२ चेंडूंमध्ये ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा फटकावल्या.
दिल्ली ‘जायबंदी’
अंतिम सामन्यात अगोदरच अडचणीत सापडलेल्या दिल्लीच्या संघाला खेळाडूंच्या दुखापतींनीही सतावले आहे. शनिवारी क्षेत्ररक्षण करताना दिल्लीचा डावखुरा फिरकीपटू मनन शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो रविवारी गोलंदाजी करू शकला नाही. उर्वरित दोन दिवसही तो खेळू शकणार नसल्याची माहिती दिल्लीचे प्रशिक्षक के. पी. भास्कर यांनी दिली. दरम्यान, सकाळच्या सत्रात २ विकेट घेणारा दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला मांडीचे स्नायू दुखावल्याने चौदावे षटक अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले. गौतम गंभीरच्याही हाताचा अंगठा दुखावल्याने त्याला क्षेत्ररक्षण करता आले नाही. मात्र, गंभीर व सैनी यांच्या दुखापती गंभीर नसून, ते सोमवारी मैदानात उतरतील, असे संघव्यवस्थापनाने सांगितले.
क्षणचित्रे
१)दिल्लीविरुद्धच्या रणजी फायनलमध्ये विदर्भने रविवारी २३३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
२)अक्षय वाडकरने महत्त्वाच्या क्षणी शतक केले. त्याच्या नाबाद १३३ धावांमुळे विदर्भने रविवारी दिवसअखेरीस ७ बाद ५२८ अशी खणखणीत मजल मारली आहे.
३)विदर्भने दिल्लीला पहिल्या डावात २९५ धावांत गुंडाळले आहे.
स्कोअरबोर्डः दिल्ली २९५ वि. विदर्भ (फैझ फझल ६७, रामस्वामी ३१, वसिम जाफर ७८, अपूर्व वानखेडे २८, अक्षय वाडकर खेळत आहे १३३, आदित्य सरवटे ७९, सिद्धेश नेरळ खेळत आहे ५६; आकाश सुदान २७-३-१०२-२, नवदीप सैनी ३२.५-४-१२६-३).
विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी पहिल्या डावात २३३ धावांची भक्कम आघाडी घेतली असून, विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अक्षय वाडकरचे नाबाद शतक आणि आदित्य सरवटे व सिद्धेश नेरळ यांच्या अर्धशतकांच्या जोरावर विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५२८ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी विदर्भाने ४ बाद २०६ धावा करून चांगली सुरुवात केली होती. त्यावेळी वसिम जाफर ६१, तर अक्षय वखरे ० धावांवर खेळत होते. रविवारी पहिल्या १२ षटकांमध्येच विदर्भाने हे दोन्ही फलंदाज गमावले. नवदीप सैनीने प्रथम अक्षयला १७ धावांवर बाद केले व नंतर जाफरला पायचित पकडून विदर्भाची अवस्था ६ बाद २४६ अशी केली. जाफरने १५० चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ७८ धावा केल्या. त्या वेळी विदर्भ ४९ धावांनी पिछाडीवर होता आणि विदर्भाचा डाव लवकर गुंडाळून पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेण्याची दिल्लीला संधी होती. मात्र, विदर्भाचा यष्टीरक्षक अक्षय वाडकरने सरवटे आणि नेरळ यांच्यासह चिवट फलंदाजी करून दिल्लीचे मनसुभे उधळून लावले.
दिवसाच्या उर्वरित खेळात दिल्लीला केवळ एक विकेट मिळवता आली. वाडकर आणि सरवटे यांनी सातव्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी करून विदर्भाला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. सरवटे १५४ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ७९ धावा करून बाद झाला. त्यानंतर वाडकरने नेरळसोबत अभेद्य शतकी भागीदारी रचून दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, वाडकरने कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या शतकालाही गवसणी घातली. यंदाच्याच मोसमात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वाडकरचा हा पाचवाच रणजी सामना आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वाडकरने २४३ चेंडूंमध्ये १७ चौकार व एका षटकारांसह १३३ धावा केल्या होत्या, नेरळने ९२ चेंडूंमध्ये ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा फटकावल्या.
दिल्ली ‘जायबंदी’
अंतिम सामन्यात अगोदरच अडचणीत सापडलेल्या दिल्लीच्या संघाला खेळाडूंच्या दुखापतींनीही सतावले आहे. शनिवारी क्षेत्ररक्षण करताना दिल्लीचा डावखुरा फिरकीपटू मनन शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो रविवारी गोलंदाजी करू शकला नाही. उर्वरित दोन दिवसही तो खेळू शकणार नसल्याची माहिती दिल्लीचे प्रशिक्षक के. पी. भास्कर यांनी दिली. दरम्यान, सकाळच्या सत्रात २ विकेट घेणारा दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला मांडीचे स्नायू दुखावल्याने चौदावे षटक अर्धवट सोडून मैदानाबाहेर जावे लागले. गौतम गंभीरच्याही हाताचा अंगठा दुखावल्याने त्याला क्षेत्ररक्षण करता आले नाही. मात्र, गंभीर व सैनी यांच्या दुखापती गंभीर नसून, ते सोमवारी मैदानात उतरतील, असे संघव्यवस्थापनाने सांगितले.
क्षणचित्रे
१)दिल्लीविरुद्धच्या रणजी फायनलमध्ये विदर्भने रविवारी २३३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
२)अक्षय वाडकरने महत्त्वाच्या क्षणी शतक केले. त्याच्या नाबाद १३३ धावांमुळे विदर्भने रविवारी दिवसअखेरीस ७ बाद ५२८ अशी खणखणीत मजल मारली आहे.
३)विदर्भने दिल्लीला पहिल्या डावात २९५ धावांत गुंडाळले आहे.
स्कोअरबोर्डः दिल्ली २९५ वि. विदर्भ (फैझ फझल ६७, रामस्वामी ३१, वसिम जाफर ७८, अपूर्व वानखेडे २८, अक्षय वाडकर खेळत आहे १३३, आदित्य सरवटे ७९, सिद्धेश नेरळ खेळत आहे ५६; आकाश सुदान २७-३-१०२-२, नवदीप सैनी ३२.५-४-१२६-३).