मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
एजबस्टन येथे रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावून सर्वांना चकित करणारा फरार उद्योगपती विजय मल्ल्या यानं सोमवारी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. कर्णधार विराट कोहलीच्या संस्थेनं आयोजित केलेल्या एका चॅरिटी डिनरला मल्ल्या अचानक उपस्थित राहिला. त्याला पाहून भारतीय खेळाडूंची अक्षरश: पळापळ झाली. विनाकारण कोणताही वाद ओढवू नये म्हणून कार्यक्रम संपण्याआधीच सर्व खेळाडूंनी तिथून काढता पाय घेतला.
भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळालेला मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहतोय. न्यायालयानं व सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) वारंवार समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहण्याचं टाळल्यामुळं त्याला फरार घोषित करण्यात आलंय. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार ब्रिटन सरकारशी वाटाघाटी करतंय. अशातच रविवारी त्यानं सामना पाहण्यासाठी हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, त्याची पर्वा न करता दुसऱ्याच दिवशी मल्ल्या कोहलीच्या 'चॅरिटी डिनर' कार्यक्रमात अवतरला.
'मल्ल्याच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाचे खेळाडू गांगरून गेले होते. प्रत्येकजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता', असं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यानं सांगितलं. 'विराट किंवा त्याच्या संस्थेनं मल्ल्याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नव्हतं. कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणीतरी त्याला बोलावलेलं असावं. खेळाडूंसाठी तो मोठाच पेचप्रसंग होता. मल्ल्यानं तिथून जावं असा त्याला सांगता येत नव्हतं. त्यामुळं विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनीच तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,' असंही या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
एजबस्टन येथे रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावून सर्वांना चकित करणारा फरार उद्योगपती विजय मल्ल्या यानं सोमवारी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. कर्णधार विराट कोहलीच्या संस्थेनं आयोजित केलेल्या एका चॅरिटी डिनरला मल्ल्या अचानक उपस्थित राहिला. त्याला पाहून भारतीय खेळाडूंची अक्षरश: पळापळ झाली. विनाकारण कोणताही वाद ओढवू नये म्हणून कार्यक्रम संपण्याआधीच सर्व खेळाडूंनी तिथून काढता पाय घेतला.
भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळालेला मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहतोय. न्यायालयानं व सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) वारंवार समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहण्याचं टाळल्यामुळं त्याला फरार घोषित करण्यात आलंय. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार ब्रिटन सरकारशी वाटाघाटी करतंय. अशातच रविवारी त्यानं सामना पाहण्यासाठी हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, त्याची पर्वा न करता दुसऱ्याच दिवशी मल्ल्या कोहलीच्या 'चॅरिटी डिनर' कार्यक्रमात अवतरला.
'मल्ल्याच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाचे खेळाडू गांगरून गेले होते. प्रत्येकजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता', असं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यानं सांगितलं. 'विराट किंवा त्याच्या संस्थेनं मल्ल्याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नव्हतं. कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणीतरी त्याला बोलावलेलं असावं. खेळाडूंसाठी तो मोठाच पेचप्रसंग होता. मल्ल्यानं तिथून जावं असा त्याला सांगता येत नव्हतं. त्यामुळं विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनीच तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,' असंही या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.