अ‍ॅपशहर

विराटनं केला होता कुंबळेचा अपमान?

गेल्या सहा महिन्यांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे एकमेकांशी बोलतच नव्हते, असा खळबळजनक खुलासा बीसीसीआयनं केल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra Times 22 Jun 2017, 11:15 am
मटा ऑनलाइन वृत्त नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli abused anil kumble in team meeting two days ahead of india pakistan final
विराटनं केला होता कुंबळेचा अपमान?


गेल्या सहा महिन्यांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे एकमेकांशी बोलतच नव्हते, असा खळबळजनक खुलासा बीसीसीआयनं केल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्याच्या दोन दिवस आधी झालेल्या टीम इंडियाच्या बैठकीत विराट कोहलीनं अनिल कुंबळेचा सर्वांसमोर अपमान केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर येतेय.

'प्रशिक्षक म्हणून तुम्हाला कायम ठेवण्यास भारतीय संघातील खेळाडूंचा विरोध आहे', असं म्हणत विराटनं कुंबळेचा पाणउतारा केला होता. त्यावर, 'झालं तेवढं पुरे झालं', अशा शब्दांत कुंबळेनंही आपला राग व्यक्त केला, अशी 'आतली बातमी' एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

विराट कोहलीमुळेच अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचं काल त्याच्या पत्रातून स्पष्ट झालं होतं. माझी शिकवण्याची पद्धत कर्णधाराला मान्य नाही, हे ज्या क्षणी मला बीसीसीआयनं सांगितलं, त्यानंतर लगेचच मी पद सोडायचा निर्णय घेतला, असं कुंबळेनं या पत्रात म्हटलं होतं. कर्णधारासोबतची भागीदारी अस्थिर झाल्याचंही त्यानं सूचित केलं होतं. परंतु, विराटचं 'वेगळं मत' बीसीसीआयनं कुंबळेला औपचारिकरित्या सांगायच्या आधी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्याचं हळूहळू समोर येतंय.

कोहली आणि कुंबळे यांना समोरासमोर बसवून सल्लागार समितीनं घेतलेल्या बैठकीत हे दोघं एकमेकांशी बोललेच नव्हते, असा आश्चर्यजनक खुलासा काल बीसीसीआयमधील सूत्राने केला होता. कर्णधार आणि प्रशिक्षकामध्ये सहा महिने संवादच नसल्याचं ऐकून तेही स्तब्धच झाले होते. पण, भारत-पाक सामन्याआधी रणनीती आखण्यासाठी झालेल्या बैठकीत कोहलीच्या संतापाचा स्फोट झाल्याचं वृत्त अधिकच गंभीर आहे. यावेळी तो कुंबळेला अद्वातद्वा बोलला होता आणि कुंबळेचा रागही अनावर झाला होता. पण या दोघांमधील बेबनाव हेच अंतिम सामन्यातील भारताच्या दारूण पराभवाचं एक प्रमुख कारण असल्याचं आता कुणीही सहज सांगू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज