दिल्ली:
२०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये प्रवास करताना ट्रेनमध्ये एक आरक्षित बोगी, सोबत पत्नी आणि खाण्यासाठी केळी मिळावीत, अशी अजब मागणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं संघाच्या वतीनं बीसीसीआयकडं केली आहे. विराटच्या या 'विश लिस्ट'मुळं बीसीसीआय चक्रावली असली तरी या मागण्या मंजूर झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं पत्नीला देशाबाहेरील दौऱ्यांवर नेण्याची परवानगी भारतीय खेळाडूंना दिली होती. मात्र, बीसीसीआयच्या गाड्यांमधून खेळाडूंच्या पत्नींना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळंच आता विश्वचषकादरम्यान पत्नीसोबत प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये आरक्षित बोगी द्या, अशी मागणी टीम विराटनं केली आहे. बीसीसीआयनं ही मागणी मान्य केली आहे. अर्थात, ट्रेनच्या प्रवासादरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे.
खायला केळी मिळावी ही खेळाडूंची मागणीही बीसीसीआयनं मान्य केली आहे. इंग्लंडमध्ये उत्कृष्ट जिम आणि खाण्यापिण्याची चंगळ असणाऱ्या हॉटेल्समध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था केली जाते. पण इंग्लंडमध्ये भारतीय संघाला वेळच्या वेळी केळी खायला मिळत नाहीत. बीसीसीआयनं त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे.
२०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये प्रवास करताना ट्रेनमध्ये एक आरक्षित बोगी, सोबत पत्नी आणि खाण्यासाठी केळी मिळावीत, अशी अजब मागणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं संघाच्या वतीनं बीसीसीआयकडं केली आहे. विराटच्या या 'विश लिस्ट'मुळं बीसीसीआय चक्रावली असली तरी या मागण्या मंजूर झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं पत्नीला देशाबाहेरील दौऱ्यांवर नेण्याची परवानगी भारतीय खेळाडूंना दिली होती. मात्र, बीसीसीआयच्या गाड्यांमधून खेळाडूंच्या पत्नींना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळंच आता विश्वचषकादरम्यान पत्नीसोबत प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये आरक्षित बोगी द्या, अशी मागणी टीम विराटनं केली आहे. बीसीसीआयनं ही मागणी मान्य केली आहे. अर्थात, ट्रेनच्या प्रवासादरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे.
खायला केळी मिळावी ही खेळाडूंची मागणीही बीसीसीआयनं मान्य केली आहे. इंग्लंडमध्ये उत्कृष्ट जिम आणि खाण्यापिण्याची चंगळ असणाऱ्या हॉटेल्समध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था केली जाते. पण इंग्लंडमध्ये भारतीय संघाला वेळच्या वेळी केळी खायला मिळत नाहीत. बीसीसीआयनं त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे.