मुंबईः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला सुट्ट्यांची गरज आहे, असं मत सलामीवीर लोकेश राहुल यानं व्यक्त केलं. प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात राहुलनं हे मत व्यक्त केलंय. या कार्यक्रमात हार्दिक पंड्याही सहभागी झाला होता. विराट कोहली मैदानावर नेहमी आक्रमक असतो. यावरून सुट्टीची किंवा विश्रांतीची सर्वाधिक आवश्यकता कोणाला आहे, असा प्रश्न करणनं राहुलला विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यानं विराटचं नाव घेतलं. विराटनं शांतपणे गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. विश्रांती किंवा सुट्टी घेण्याबाबत त्याला अनेकदा सांगितलं. मात्र, तो केवळ कामच करत राहतो, असं राहुल म्हणाला. लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांचा 'कॉफी विथ करण' कार्यक्रम उद्या म्हणजेच रविवारी प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
फिटनेसबाबतीत तू कोणाचा सल्ला घेतो, असा प्रश्न पंड्याला विचारला असता, त्यानं विराटचं नाव घेतलं. टीममध्ये सर्वांत रोमँटिक कोण आहे, असा राहुलला विचारलं असता, त्यानं लगेचच विराटचं नाव घेतलं. त्याचप्रमाणे सर्वात उत्कृष्ट कर्णधार कोण आहे, असं विचारलं असता दोघांनीही महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं. कारकिर्दीचा विचार करता धोनीच सर्वोत्तम कर्णधार धोनीच असल्याचं मत दोघांनी व्यक्त केलं.
फिटनेसबाबतीत तू कोणाचा सल्ला घेतो, असा प्रश्न पंड्याला विचारला असता, त्यानं विराटचं नाव घेतलं. टीममध्ये सर्वांत रोमँटिक कोण आहे, असा राहुलला विचारलं असता, त्यानं लगेचच विराटचं नाव घेतलं. त्याचप्रमाणे सर्वात उत्कृष्ट कर्णधार कोण आहे, असं विचारलं असता दोघांनीही महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं. कारकिर्दीचा विचार करता धोनीच सर्वोत्तम कर्णधार धोनीच असल्याचं मत दोघांनी व्यक्त केलं.