अ‍ॅपशहर

‘लग्न महत्त्वाचे होते’

अनुष्का शर्मासह झालेल्या विवाह सोहळ्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळत आहेस, या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, लग्न हे खूप महत्त्वाचे होते. हा काळ आमच्या दोघांसाठी खास असाच होता.

Maharashtra Times 28 Dec 2017, 4:10 am
मुंबई : अनुष्का शर्मासह झालेल्या विवाह सोहळ्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळत आहेस, या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, लग्न हे खूप महत्त्वाचे होते. हा काळ आमच्या दोघांसाठी खास असाच होता. त्यामुळे क्रिकेटकडे परतणे कठीण वाटले नाही. कारण क्रिकेट हे माझ्या रक्तात आहे. प्रत्येक खेळाडूची क्रिकेटबद्दल भावना असेल, तीच माझीही आहे. गेल्या तीन आठवड्यात मी क्रिकेट खेळलेलो नाही. दक्षिण आफ्रिकेतच आता मी सराव करणार आहे. मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे तयार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli press conference after marriage
‘लग्न महत्त्वाचे होते’


पृथ्वीशी संवाद- १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ व इतर खेळाडूंशी संवाद साधण्याची विनंती मला राहुल द्रविडने केली, असे सांगत विराट म्हणाला की, मी पृथ्वीबद्दल बरेच ऐकलेले आहे. शास्त्री यांनीही मला त्याच्याबद्दल खूप काही सांगितले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्यात खास असे काहीतरी आहे. पत्रकार परिषदेनंतर या युवा संघाला भेटण्याची तयारी विराटने दाखविली. हे दोन्ही संघ एकाच विमानाने दुबईला रवाना होणार आहेत. तिथून ते आपापल्या दौऱ्यांसाठी निघतील.

धवनबाबत शंका - भारताचा सलामीवीर शिखर धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघासोबत हॉटेलमध्ये येताना त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला पट्टी बांधल्याचे दिसत होते. त्याची एमआरआय चाचणीही करण्यात आली होती. तो जर पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही तर के.एल. राहुलला मुरली विजयसह सलामीला येण्याची संधी मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज