अ‍ॅपशहर

...आणि विराट कोहलीने मैदान सोडले!

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून कर्णधार विराट कोहलीला अचानक मैदानाबाहेर जावे लागले. चेंडू अडवताना खांद्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची तात्पूरती धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली आहे.

Maharashtra Times 16 Mar 2017, 3:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli walks off the field after injuring his right shoulder
...आणि विराट कोहलीने मैदान सोडले!


भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून कर्णधार विराट कोहलीला अचानक मैदानाबाहेर जावे लागले. चेंडू अडवताना खांद्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची तात्पूरती धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आली आहे.

लंच ब्रेकनंतर खेळ सुरू झाल्यावर पीटर हँड्सकॉम्बने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर एक सणसणीत चौकार लगावला. हा चौकार अडविण्यासाठी कोहलीने चेंडूचा पाठलाग केला. यावेळी त्याने चेंडू अडविण्यासाठी उंच उडी मारली असता खाली पडताना त्याचा डावा खांदा जमीनीवर जोरदार आदळला. त्यामुळे खांदा दुखू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. परिणामी कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज