वृत्तसंस्था, किंग्जस्टन
मिळालेल्या जीवदानांचा पुरेपुर फायदा घेत एव्हिन ल्युइसने झळकविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर यजमान वेस्ट इंडिजने टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर नऊ विकेटनी विजय नोंदविला. ल्युइसचे हे टी-२०मधील दुसरेच शतक ठरले. त्याने पहिले शतकही गेल्या वर्षी भारताविरुद्धच झळकावले होते. भारताने या दौऱ्यात वन-डे मालिका ३-१ ने जिंकली. मात्र, या दौऱ्यातील एकमेव टी-२० सामन्यात भारताला हार पत्करावी लागली.
‘सबिना पार्क’मध्ये ही लढत झाली. भारताने वेस्ट इंडिजसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य वेस्ट इंडिजने १९व्या षटकात एका विकेटच्या मोबदल्यात पार केले. सहाव्या षटकात भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर महंमद शमी आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील समन्वयाअभावी ल्युइसचा झेल सुटला, तर पुढच्याच षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने ल्युइसचा झेल सोडला. या जीवदानांचा पुरेपुर फायदा घेत ल्युइसने ६२ चेंडूंत सहा चौकार आणि १२ षटकारांसह नाबाद १२५ धावांची खेळी केली. टी-२०मधील वेस्ट इंडिजकडून नोंदली गेलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याबाबतीत ल्युइसने गेलला मागे टाकले. गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ३३ चेंडूंत ६४ धावांची सलामी दिली. सहाव्या षटकात विल्यम्सने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. कोहलीने २२ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ३९ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ शिखरही धावबाद झाला. शिखरने १२ चेंडूंत पाच चौकारांसह २३ धावांची खेळी केली. त्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. दिनेश कार्तिक अर्धशतक साजरे करणार असे वाटत असतानाच, सॅम्युअल्सने त्याचा त्रिफळा उडविला. दिनेश कार्तिक २९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक-रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. महेंद्रसिंह धोनी दोन, तर केदार जाधव चार धावांची भर घालून परतला. अखेरच्या टप्प्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी १२ चेंडूंत २६ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला १९० धावांपर्यंत मजल मारून दिली.
धावफलक: भारत – विराट कोहली झे. नारायण गो. विल्यम्स ३९, शिखर धवन धावबाद २३, रिषभ पंत झे. वॉल्टन गो. टेलर ३८, दिनेश कार्तिक त्रि. गो. सॅम्युअल्स ४८, महेंद्रसिंह धोनी झे. सॅम्युअल्स गो. टेलर २, केदार जाधव झे. नारायण गो. विल्यम्स ४, रवींद्र जडेजा नाबाद १३, रविचंद्रन अश्विन नाबाद ११; अवांतर – १२; एकूण – २० षटकांत ६ बाद १९०.
बाद क्रम: १-६४,२-६५, ३-१५१, ४-१५६, ५-१५६, ६-१६४.
गोलंदाजी: सॅम्युअल बद्री ४-०-३१-०; जेरोम टेलर ४-०-३१-२; केसरीक विल्यम्स ४-०-४२-२; कार्लोस ब्रेथवेट २-०-२६-०; सुनील नारायण ३-०-२२-०; मर्लन सॅम्युअल्स ३-०-३२-१.
वेस्ट इंडिज – ख्रिस गेल झे. धोनी गो. कुलदीप यादव १८, एव्हिन ल्युइस नाबाद १२५, मर्लन सॅम्युअल्स नाबाद ३६; अवांतर – १५; एकूण – १८.३ षटकांत १ बाद १९४. बाद क्रम ः १-८२. गोलंदाजी ः भुवनेश्वर ४-०-२७-०; रविचंद्रन अश्विन ४-०-३९-०; महंमद शमी ३-०-४६-०; कुलदीप यादव ४-०३४-१; रवींद्र जडेजा – ३.३-०-४१-०.
मिळालेल्या जीवदानांचा पुरेपुर फायदा घेत एव्हिन ल्युइसने झळकविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर यजमान वेस्ट इंडिजने टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर नऊ विकेटनी विजय नोंदविला. ल्युइसचे हे टी-२०मधील दुसरेच शतक ठरले. त्याने पहिले शतकही गेल्या वर्षी भारताविरुद्धच झळकावले होते. भारताने या दौऱ्यात वन-डे मालिका ३-१ ने जिंकली. मात्र, या दौऱ्यातील एकमेव टी-२० सामन्यात भारताला हार पत्करावी लागली.
‘सबिना पार्क’मध्ये ही लढत झाली. भारताने वेस्ट इंडिजसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य वेस्ट इंडिजने १९व्या षटकात एका विकेटच्या मोबदल्यात पार केले. सहाव्या षटकात भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर महंमद शमी आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील समन्वयाअभावी ल्युइसचा झेल सुटला, तर पुढच्याच षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने ल्युइसचा झेल सोडला. या जीवदानांचा पुरेपुर फायदा घेत ल्युइसने ६२ चेंडूंत सहा चौकार आणि १२ षटकारांसह नाबाद १२५ धावांची खेळी केली. टी-२०मधील वेस्ट इंडिजकडून नोंदली गेलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याबाबतीत ल्युइसने गेलला मागे टाकले. गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावांची खेळी केली होती. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी ३३ चेंडूंत ६४ धावांची सलामी दिली. सहाव्या षटकात विल्यम्सने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. कोहलीने २२ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ३९ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ शिखरही धावबाद झाला. शिखरने १२ चेंडूंत पाच चौकारांसह २३ धावांची खेळी केली. त्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. दिनेश कार्तिक अर्धशतक साजरे करणार असे वाटत असतानाच, सॅम्युअल्सने त्याचा त्रिफळा उडविला. दिनेश कार्तिक २९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक-रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. महेंद्रसिंह धोनी दोन, तर केदार जाधव चार धावांची भर घालून परतला. अखेरच्या टप्प्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी १२ चेंडूंत २६ धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला १९० धावांपर्यंत मजल मारून दिली.
धावफलक: भारत – विराट कोहली झे. नारायण गो. विल्यम्स ३९, शिखर धवन धावबाद २३, रिषभ पंत झे. वॉल्टन गो. टेलर ३८, दिनेश कार्तिक त्रि. गो. सॅम्युअल्स ४८, महेंद्रसिंह धोनी झे. सॅम्युअल्स गो. टेलर २, केदार जाधव झे. नारायण गो. विल्यम्स ४, रवींद्र जडेजा नाबाद १३, रविचंद्रन अश्विन नाबाद ११; अवांतर – १२; एकूण – २० षटकांत ६ बाद १९०.
बाद क्रम: १-६४,२-६५, ३-१५१, ४-१५६, ५-१५६, ६-१६४.
गोलंदाजी: सॅम्युअल बद्री ४-०-३१-०; जेरोम टेलर ४-०-३१-२; केसरीक विल्यम्स ४-०-४२-२; कार्लोस ब्रेथवेट २-०-२६-०; सुनील नारायण ३-०-२२-०; मर्लन सॅम्युअल्स ३-०-३२-१.
वेस्ट इंडिज – ख्रिस गेल झे. धोनी गो. कुलदीप यादव १८, एव्हिन ल्युइस नाबाद १२५, मर्लन सॅम्युअल्स नाबाद ३६; अवांतर – १५; एकूण – १८.३ षटकांत १ बाद १९४. बाद क्रम ः १-८२. गोलंदाजी ः भुवनेश्वर ४-०-२७-०; रविचंद्रन अश्विन ४-०-३९-०; महंमद शमी ३-०-४६-०; कुलदीप यादव ४-०३४-१; रवींद्र जडेजा – ३.३-०-४१-०.