अ‍ॅपशहर

भारताचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक: शहा

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. भारताने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केल्याची प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2019, 4:04 pm
नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. भारताने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केल्याची प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit-shah


अमित शहा यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाच टीम इंडियाच्या खेळाचं कौतुकही केलं आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केला आणि पूर्वी सारखाच हा स्ट्राइक होता. संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम होती. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान वाटेल, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.



संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करत संपूर्ण संघाचं कौतुक केलं आहे. तर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी टीम इंडियाचे फोटो शेअर करत संपूर्ण संघाचं अभिनंदन केलं आहे. विश्वचषक सामन्यात शानदार विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन, असं ट्विट करत गोयल यांनी पुढील सामन्यांसाठी टीम इंडियाला शुभेच्छाही दिल्या आहेत. भारत जिंकणार, पाकिस्तान हारणार हे आधीच सांगितलं होतं. भारतीय संघाचं खूप खूप अभिनंदन, अशा शब्दात किरण रिजीजू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याशिवाय राज्यवर्धन राठोड, सचिन पायलट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक गेहलोत यांनीही टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.




महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज