> आशिष पेंडसे
फुटबॉलचा देवता पेले यांच्यानंतर वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा आणि गोल लगावणारा सर्वांत तरुण खेळाडू-किलियन एम्बापे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमधील पहिलाच सेल्फगोल - मारिओ मान्झुकिच. १९६६ नंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक सहा गोल - स्कोअरलाइनदेखील सारखीच ४-२. कर्णधार गोलकीपर वर्ल्ड कप ट्रॉफी उंचाविण्याची तिसरीच वेळ, यापूर्वी इटलीचे डिनो झॉफ (१९८२) आणि स्पेनचा इकेर कॅसिलास (२०१०) यांच्या नावे ही कामगिरी. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप उंचाविणारी केवळ तिसरीच व्यक्ती - डिडिएर देशाम्प, फ्रान्सच्या १९९८ च्या विजयाचे कर्णधार. यापूर्वी, ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीच्या फ्रान्झ बेकनबोर यांच्या नावे हा विक्रम. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात प्रथमच 'व्हीएआर'चे नाट्य...
...वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातून आणखी काय हवे? अगदी पैसा वसूल! अर्थात, केवळ अंतिम सामनाच नाही, तर संपूर्ण महिनाभरचा हा 'फुटबॉलड्रामा' खरोखरीच उत्कंठावर्धक ठरला.
अगदी १९८२ पासूनच्या वर्ल्ड कपविषयक घडामोडींचा साक्षीदार या नात्याने मी छातीठोकपणे सांगू शकतो, की यंदाच्या वर्ल्ड कपसंदर्भात भारतामधून उमटलेली पॅशन ही यापूर्वी कधीही न पाहिलेली होती. सोशल मीडिया हा मोठा प्रभावशाली घटक आहे. पण, एकूणातच फुटबॉलविषयीचे प्रेम दिवसागणिक वाढताना दिसले. यंदाचा वर्ल्ड कप फीव्हर हा दर चार वर्षांनी येणारी निव्वळ फुटबॉलक्रेझ नव्हती. तर, फुटबॉलविषयक विकसित झालेल्या जाणीव-जागरूकतेची प्रचिती होती. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा, फ्रान्समधील लिग वन, जर्मनीमधील बुंडस लिगा यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. रियल माद्रिद-बार्सिलोनापासून मँचेस्टर युनायटेड-चेल्सी, बायर्न म्युनिकसारखे जगविख्यात क्लब आणि रोनाल्डो-मेस्सी-नेमार, हो आता मॉड्रिच-एम्बापेदेखील! यांच्या अलौकिक फुटबॉलकौशल्याची ती मोहिनी आहे. पण, एकूणातच फुटबॉलविषयीची आस्था आणि आत्मियता खूपच वाढलेली दिसते.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रेक्षकांना मैदानात येऊन संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि मुंबई फुटबॉल एरिना कशी हाऊसफुल्ल झाली, हे आपण सर्वांनी सोशल मीडियावरून पाहिले, फॉरवर्डदेखील केले. गेल्या वर्षी भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कपमुळे जादुई कांडी फिरून एका रात्रीत भारत वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार, अशी कुणाचीच अपेक्षा नाही. वर्ल्ड कप उंचाविण्यासाठी आणि लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी फ्रान्स-क्रोएशियाला तब्बल २० वर्षांच्या कालावधी लागला. २००० साली रसातळाला गेलेल्या जर्मन फुटबॉलने वर्ल्ड कप उंचावला तो २०१४ साली. कायमच फेव्हरिट राहण्याची किमया केवळ ब्राझीलच करू शकतो. कारण, फुटबॉल ही त्यांची संस्कृती आहे. अगदी, आपल्या 'टीम इंडिया'प्रमाणे!
आता जानेवारी २०१९ मध्ये भारतीय फुटबॉल संघ आशियाई फुटबॉल स्पर्धेत झुंजेल. त्यानंतर २०२० साली पुढील वर्ल्ड कपची पात्रता फेरी सुरू होईल. २०२६ साली सहभागी देशांची संख्या ३२ वरून ४८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आशियातील पाच-सहाऐवजी आठ-नऊ संघांना प्रवेश मिळू शकतो. म्हणजेच, भारतासाठी पुढील सहा-सात वर्षांत आशियात टॉप टेनमध्ये येण्याचे आव्हान आहे.
अर्थात, वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणे आणि देशात फुटबॉल व एकूणातच क्रीडासंस्कृती विकसित करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामधील क्रीडासंस्कृती विकसित करणे, आपल्या हातात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) क्रीडा या विषयाचा दररोजच्या वेळापत्रकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशानंतर आता आपण क्रीडाप्रेमी रंग दे तिरंगा म्हणत पुढील महिन्यातील एशियाड स्पर्धा आणि २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी सज्ज होऊ. खेलो इंडियाचे नारे देऊ. यंग आणि फिट इंडियाचा नारा सचिन देतोय. देशामध्ये कधी नव्हे, एवढी खेळांविषयीची जागरूकता निर्माण झाली आहे. मग ते फिटनेससाठी असो, की फॅशनसाठी!
केवळ चार वर्षांनंतर वर्ल्ड कपचा आनंद लुटतानाच नव्हे, तर एक क्रीडाप्रेमी म्हणून आपण वर्षभर क्रीडासंस्कार तेवत ठेवला, तर भारतामध्ये नक्कीच पाश्चिमात्य देशांप्रमाणे 'कम्युनिटी स्पोर्ट्स मूव्हमेंट'चा 'किक-ऑफ' होईल!
म्हणूनच, दसविदानिया रशिया... आता चार वर्षांनी कतारमध्ये भेटू, असे मी म्हणणार नाही. कधी हौशी खेळाडू म्हणून, तर कधी क्रीडाप्रेमी पालक-प्रेक्षक म्हणून, पुढील चार वर्षे कायमच भेटत राहू...!
(लेखक हे व्हिवा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत)
फुटबॉलचा देवता पेले यांच्यानंतर वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा आणि गोल लगावणारा सर्वांत तरुण खेळाडू-किलियन एम्बापे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमधील पहिलाच सेल्फगोल - मारिओ मान्झुकिच. १९६६ नंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक सहा गोल - स्कोअरलाइनदेखील सारखीच ४-२. कर्णधार गोलकीपर वर्ल्ड कप ट्रॉफी उंचाविण्याची तिसरीच वेळ, यापूर्वी इटलीचे डिनो झॉफ (१९८२) आणि स्पेनचा इकेर कॅसिलास (२०१०) यांच्या नावे ही कामगिरी. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप उंचाविणारी केवळ तिसरीच व्यक्ती - डिडिएर देशाम्प, फ्रान्सच्या १९९८ च्या विजयाचे कर्णधार. यापूर्वी, ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीच्या फ्रान्झ बेकनबोर यांच्या नावे हा विक्रम. वर्ल्ड कप अंतिम सामन्यात प्रथमच 'व्हीएआर'चे नाट्य...
...वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातून आणखी काय हवे? अगदी पैसा वसूल! अर्थात, केवळ अंतिम सामनाच नाही, तर संपूर्ण महिनाभरचा हा 'फुटबॉलड्रामा' खरोखरीच उत्कंठावर्धक ठरला.
अगदी १९८२ पासूनच्या वर्ल्ड कपविषयक घडामोडींचा साक्षीदार या नात्याने मी छातीठोकपणे सांगू शकतो, की यंदाच्या वर्ल्ड कपसंदर्भात भारतामधून उमटलेली पॅशन ही यापूर्वी कधीही न पाहिलेली होती. सोशल मीडिया हा मोठा प्रभावशाली घटक आहे. पण, एकूणातच फुटबॉलविषयीचे प्रेम दिवसागणिक वाढताना दिसले. यंदाचा वर्ल्ड कप फीव्हर हा दर चार वर्षांनी येणारी निव्वळ फुटबॉलक्रेझ नव्हती. तर, फुटबॉलविषयक विकसित झालेल्या जाणीव-जागरूकतेची प्रचिती होती. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा, फ्रान्समधील लिग वन, जर्मनीमधील बुंडस लिगा यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे. रियल माद्रिद-बार्सिलोनापासून मँचेस्टर युनायटेड-चेल्सी, बायर्न म्युनिकसारखे जगविख्यात क्लब आणि रोनाल्डो-मेस्सी-नेमार, हो आता मॉड्रिच-एम्बापेदेखील! यांच्या अलौकिक फुटबॉलकौशल्याची ती मोहिनी आहे. पण, एकूणातच फुटबॉलविषयीची आस्था आणि आत्मियता खूपच वाढलेली दिसते.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने प्रेक्षकांना मैदानात येऊन संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि मुंबई फुटबॉल एरिना कशी हाऊसफुल्ल झाली, हे आपण सर्वांनी सोशल मीडियावरून पाहिले, फॉरवर्डदेखील केले. गेल्या वर्षी भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कपमुळे जादुई कांडी फिरून एका रात्रीत भारत वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार, अशी कुणाचीच अपेक्षा नाही. वर्ल्ड कप उंचाविण्यासाठी आणि लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी फ्रान्स-क्रोएशियाला तब्बल २० वर्षांच्या कालावधी लागला. २००० साली रसातळाला गेलेल्या जर्मन फुटबॉलने वर्ल्ड कप उंचावला तो २०१४ साली. कायमच फेव्हरिट राहण्याची किमया केवळ ब्राझीलच करू शकतो. कारण, फुटबॉल ही त्यांची संस्कृती आहे. अगदी, आपल्या 'टीम इंडिया'प्रमाणे!
आता जानेवारी २०१९ मध्ये भारतीय फुटबॉल संघ आशियाई फुटबॉल स्पर्धेत झुंजेल. त्यानंतर २०२० साली पुढील वर्ल्ड कपची पात्रता फेरी सुरू होईल. २०२६ साली सहभागी देशांची संख्या ३२ वरून ४८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आशियातील पाच-सहाऐवजी आठ-नऊ संघांना प्रवेश मिळू शकतो. म्हणजेच, भारतासाठी पुढील सहा-सात वर्षांत आशियात टॉप टेनमध्ये येण्याचे आव्हान आहे.
अर्थात, वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणे आणि देशात फुटबॉल व एकूणातच क्रीडासंस्कृती विकसित करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामधील क्रीडासंस्कृती विकसित करणे, आपल्या हातात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) क्रीडा या विषयाचा दररोजच्या वेळापत्रकात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशानंतर आता आपण क्रीडाप्रेमी रंग दे तिरंगा म्हणत पुढील महिन्यातील एशियाड स्पर्धा आणि २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी सज्ज होऊ. खेलो इंडियाचे नारे देऊ. यंग आणि फिट इंडियाचा नारा सचिन देतोय. देशामध्ये कधी नव्हे, एवढी खेळांविषयीची जागरूकता निर्माण झाली आहे. मग ते फिटनेससाठी असो, की फॅशनसाठी!
केवळ चार वर्षांनंतर वर्ल्ड कपचा आनंद लुटतानाच नव्हे, तर एक क्रीडाप्रेमी म्हणून आपण वर्षभर क्रीडासंस्कार तेवत ठेवला, तर भारतामध्ये नक्कीच पाश्चिमात्य देशांप्रमाणे 'कम्युनिटी स्पोर्ट्स मूव्हमेंट'चा 'किक-ऑफ' होईल!
म्हणूनच, दसविदानिया रशिया... आता चार वर्षांनी कतारमध्ये भेटू, असे मी म्हणणार नाही. कधी हौशी खेळाडू म्हणून, तर कधी क्रीडाप्रेमी पालक-प्रेक्षक म्हणून, पुढील चार वर्षे कायमच भेटत राहू...!
(लेखक हे व्हिवा फुटबॉल मासिकाचे संपादक आहेत)