वृत्तसंस्था, लंडन
आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभव झाल्याने भारतीय महिला संघाला आता वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आज, रविवारी रंगणारी अमेरिकेविरुद्धची 'ब' गट झुंज जिंकावीच लागणार आहे. भारताने स्पर्धेच्या सलामीला इंग्लंडविरुद्ध कडवी लढत दिली. त्या सामन्यात अखेरच्या सात मिनिटांपर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती; पण जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने भारताला विजय नाकारत बरोबरी साधली होती. आयर्लंडविरुद्ध मात्र भारताने गोलच्या संधी वाया घालवत विजयासह थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याची संधी गमावली. त्यामुळे आता रविवारचा सामना भारतासाठी करो या मरो, अशा धाटणीचा असेल.
गटातील अव्वल चार संघांना बादफेरीत थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित चार स्थानांसाठी गोलफरक, विजय आणि गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या भारतीय संघ एक बरोबरी अन् एका पराभवासह 'ब' गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारचा भारताचा प्रतिस्पर्धी अमेरिकेनेही इंग्लंडला बरोबरीत रोखले, पण त्यांनाही आयर्लंडविरुद्ध १-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे या गटातील बाद फेरीप्रवेशासाठी भारतीय संघाला आता गोलफरक महत्त्वाचा ठरणार आहे. भारताचे प्रशिक्षक जोर्द मरिन म्हणाले, 'शंकाच नाही, रविवारचा सामना आम्ही जिंकणेच महत्त्वाचे आहे'.
करा पेनल्टी कॉर्नरचा सदूपयोग
इंग्लंडविरुद्ध भारताला एकही पेनल्टी कॉर्नर लाभला नव्हता; पण आयर्लंडविरुद्ध भारताने सात पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. कर्णधार राणी आणि कंपनीने रविवारी अशा चुका करून चालणार नाही. 'भारतीय संघाची भट्टी जमून आली आहे, ज्यामुळे गोल करण्याची संधी उपलब्ध होते. मात्र या संधीचा फायदा उठवत गोल करणे भारताला जमत नाही. ज्यामुळे आमचा पराभव झाला. आयर्लंडविरुद्ध आम्ही २७वेळा गोलच्या अगदी जवळ गेलो होतो. तर इंग्लंडविरुद्ध आम्हाला हे फक्त दहावेळाच जमले. आयर्लंडविरुद्ध संधीचा फायदा उठवणे जमले नाही, हेच डोके चक्रावून टाकणारे आहे', असे मरिन म्हणाले.
आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभव झाल्याने भारतीय महिला संघाला आता वर्ल्डकप हॉकी स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आज, रविवारी रंगणारी अमेरिकेविरुद्धची 'ब' गट झुंज जिंकावीच लागणार आहे. भारताने स्पर्धेच्या सलामीला इंग्लंडविरुद्ध कडवी लढत दिली. त्या सामन्यात अखेरच्या सात मिनिटांपर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती; पण जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने भारताला विजय नाकारत बरोबरी साधली होती. आयर्लंडविरुद्ध मात्र भारताने गोलच्या संधी वाया घालवत विजयासह थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याची संधी गमावली. त्यामुळे आता रविवारचा सामना भारतासाठी करो या मरो, अशा धाटणीचा असेल.
गटातील अव्वल चार संघांना बादफेरीत थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित चार स्थानांसाठी गोलफरक, विजय आणि गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या भारतीय संघ एक बरोबरी अन् एका पराभवासह 'ब' गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारचा भारताचा प्रतिस्पर्धी अमेरिकेनेही इंग्लंडला बरोबरीत रोखले, पण त्यांनाही आयर्लंडविरुद्ध १-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे या गटातील बाद फेरीप्रवेशासाठी भारतीय संघाला आता गोलफरक महत्त्वाचा ठरणार आहे. भारताचे प्रशिक्षक जोर्द मरिन म्हणाले, 'शंकाच नाही, रविवारचा सामना आम्ही जिंकणेच महत्त्वाचे आहे'.
करा पेनल्टी कॉर्नरचा सदूपयोग
इंग्लंडविरुद्ध भारताला एकही पेनल्टी कॉर्नर लाभला नव्हता; पण आयर्लंडविरुद्ध भारताने सात पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. कर्णधार राणी आणि कंपनीने रविवारी अशा चुका करून चालणार नाही. 'भारतीय संघाची भट्टी जमून आली आहे, ज्यामुळे गोल करण्याची संधी उपलब्ध होते. मात्र या संधीचा फायदा उठवत गोल करणे भारताला जमत नाही. ज्यामुळे आमचा पराभव झाला. आयर्लंडविरुद्ध आम्ही २७वेळा गोलच्या अगदी जवळ गेलो होतो. तर इंग्लंडविरुद्ध आम्हाला हे फक्त दहावेळाच जमले. आयर्लंडविरुद्ध संधीचा फायदा उठवणे जमले नाही, हेच डोके चक्रावून टाकणारे आहे', असे मरिन म्हणाले.