अ‍ॅपशहर

दे दणादण... भारतीय महिला खेळाडूंनी थायलंडचा १३-० ने उडवला धुव्वा

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात गुरजित कौरच्या ५ गोलच्या जोरावर भारताने थायलंडचा १३-० असा पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा हा पहिलाच सामना होता.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 5 Dec 2021, 5:38 pm
डोन्घा, दक्षिण कोरिया : ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरच्या पाच गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी (५ डिसेंबर) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात थायलंडचा १३-० असा दणदणीत पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. या सामन्यात सविता पुनिया संघाची कर्णधार होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम womens asian champions trophy india beats thailand by 13 0 gurjit kaur scores five goals
दे दणादण... भारतीय महिला खेळाडूंनी थायलंडचा १३-० ने उडवला धुव्वा


गुरजीतने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले, तर पाच मिनिटांनंतर वंदना कटारियाने दुसरा गोल नोंदवला. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस लिलिमा मिन्झने १४ व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला, तर गुरजीत आणि ज्योती यांनी १४व्या आणि १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत स्कोअर ५-० असा केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्व कायम राखले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राजविंदर कौरने १६ व्या मिनिटाला मैदानी गोल केला, तर गुरजीतने २४ व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा गोल केला. काही वेळातच लिलिमाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.

गुरजीतने २५व्या मिनिटाला आणखी एक गोल करून हाफ टाईमपर्यंत भारताची आघाडी ९-० अशी भरभक्कम केली. भारताने थायलंडला त्यानंतर एकही संधी दिली नाही आणि वारंवार थायलंडच्या गोलपोस्टवर हल्ले चालू ठेवले. ज्योतीने ३६व्या मिनिटाला गोल करत भारताची गोलसंख्या दुहेरी अंकात नेली, त्यानंतर सोनिकाने ४३ व्या मिनिटाला सामन्यातील तिचा पहिला गोल केला.

चौथ्या क्वार्टरमध्येही सामन्याचे चित्र बदलेल असे वाटत होते, पण भारतीय महिला संघाने आक्रमण सुरूच ठेवले. थायलंडने यावेळी चांगला बचाव केला. मोनिकाने ५५व्या मिनिटाला गोल केला, तर गुरजीतने तीन मिनिटांनंतर पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक पाचवा आणि भारतासाठी एकूण १३वा गोल केला.

महत्वाची गोष्ट म्हणजे टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. नियमित कर्णधार राणी रामपालला या स्पर्धेतून विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या अनुपस्थितीत गोलरक्षक सविता पुनियाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज