म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परभणी येथे सुरू असलेल्या राज्य शालेय कबड्डी स्पर्धेत औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व अमरावती या संघांनी आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहे.
मुलींच्या गटात उपांत्य लढतीत औरंगाबाद संघाने नाशिक संघाचा ३४-२४ असा दहा गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. कोल्हापूर संघाने लातूर संघावर चुरशीच्या लढतीत तीन गुणांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्धारित वेळेत हा सामना बरोबरीत होता. पाच-पाच चढाईत कोल्हापूरने बाजी मारली.
मुलांच्या गटात अमरावती व नाशिक संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. अमरावती संघाने मुंबईचा दोन गुणांनी पराभव केला तर नाशिक संघाने कोल्हापूर संघावर २० गुणांची आघाडी घेत विजय साकारला.
उद्घाटन प्रसंगी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दिन फारुखी, सुधीर चपळगावकर, संजय मुंडे, शैलेंद्र गौतम, ईश्वर गोसावी, रमेश खुणे, मंगल पांडे, डॉ. माधव शेजुळ, गणेश माळवे आदी उपस्थित होते.