मुंबई : महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ५८ वर्षांत प्रथमच गटातच बाद झाला. राज्य कबड्डी संघटनेने असे पुन्हा घडू नये यासाठी कठोर कारवाईचे पाऊल उचलल्याचे कळते. त्या अनुषंगाने तब्बल १० तास चाललेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत प्रशिक्षक, व्यवस्थापिका यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आणि बेशिस्तीबद्दल खेळाडू, प्रशिक्षकांवर कारवाईची शिफारस करण्यात आली. त्याअंतर्गत संघप्रशिक्षक श्रीराम भावसार यांना राज्य संघटनेच्या उपक्रमात पाच वर्षे सहभागी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापिका मनीषा गावंड यांना दोन वर्षे कबड्डी उपक्रमापासून बाहेर ठेवण्यात आले आहे. सायली केरीपाळेला दोन वर्षे, तर दीपिका जोसेफला पाच वर्षे स्पर्धा, शिबिरांपासून दूर ठेवले जाईल. स्नेहल शिंदेला २ वर्षे कबड्डीत सहभागी होता येणार नाही, असे पत्र अध्यक्षांना देण्यात आले आहे.
भावसार यांची पाच वर्षांसाठी हकालपट्टी?
महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ५८ वर्षांत प्रथमच गटातच बाद झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Aug 2019, 4:00 am