मुंबई ः जे यश चिपळूणच्या मातीत मिळविता आले नव्हते ते यश प्रभादेवीच्या मॅटवर संपादन करण्यासाठी राज्यातील जिल्हा कबड्डी संघ विशेष निमंत्रितांच्या राजाभाऊ देसाई चषक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. स्वामी समर्थ क्रीडा मंडळातर्फे आयोजित ही स्पर्धा १० ते १३ फेब्रूवारीदरम्यान हा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. सलामीची झुंज ठाणे विरुद्ध नंदुरबार अशी असेल. तर यजमान मुंबई शहरचा सलामीचा सामना अहमदनगरविरुद्ध असेल. स्पर्धेतील तगडे संघ आणि प्रो कबड्डीत जोरदार चढाया-पकडींचा खेळ करणारे स्टार कबड्डीपटू आपला दम घुमवणार असल्यामुळे चवन्नी गल्लीत उभारलेल्या नारायण सावंत क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींची गर्दी होईल असा अंदाज आहे. मुंबईला ब गटात स्थान मिळाले असून राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता रत्नागिरी अ गटात खेळत असून त्यांची गाठ ठाणे आणि नंदुरबार संघाशी पडेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत खेळतील. मुंबई शहरची ताकद पंकज मोहिते, सुशांत साहिल आणि ओमकार जाधवमुळे वाढली आहे. रत्नागिरीकडे स्वप्नील आणि शुभम शिंदेच्या तुफानी फॉर्ममुळे फार्मात आहे.
रत्नागिरी, मुंबई शहर, जेतेपदाच्या शर्यतीत
मुंबई ः जे यश चिपळूणच्या मातीत मिळविता आले नव्हते ते यश प्रभादेवीच्या मॅटवर संपादन करण्यासाठी राज्यातील जिल्हा कबड्डी संघ विशेष निमंत्रितांच्या ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 4:00 am