अ‍ॅपशहर

भारताकडून इंग्लंड ‘ऑल आऊट’

प्रदीप नरवालच्या नेहमीप्रमाणे भेदक चढाया आणि त्याला अजय ठाकूर, नितीन तोमर यांची मिळालेली साथ आणि संदीप व प्रदीप नरवालच्या अचूक पकडी याच्या जोरावर भारताने येथे सुरू असलेल्या वर्ल्डकप कबड्डीत इंग्लंडला ६९-१८ असे सहज पराभूत करत अ गटात २० गुणांसह दुसरे स्थान कायम राखले. कोरियाकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने धक्का बसलेल्या भारताने नंतरच्या चारही लढती अपेक्षेप्रमाणे सहज जिंकल्या. इंग्लंडविरुद्धचा त्यांचा अखेरचा साखळी सामना होता. आता उपांत्य फेरीत गेलेल्या भारतीय संघाची गाठ कुणाशी पडते हे उद्या थायलंड-जपान लढतीनंतर स्पष्ट होईल.

Maharashtra Times 19 Oct 2016, 12:00 am
mahesh.vichare@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2016 world cup kabaddi
भारताकडून इंग्लंड ‘ऑल आऊट’


Twitter : @mvichareMT

अहमदाबादः प्रदीप नरवालच्या नेहमीप्रमाणे भेदक चढाया आणि त्याला अजय ठाकूर, नितीन तोमर यांची मिळालेली साथ आणि संदीप व प्रदीप नरवालच्या अचूक पकडी याच्या जोरावर भारताने येथे सुरू असलेल्या वर्ल्डकप कबड्डीत इंग्लंडला ६९-१८ असे सहज पराभूत करत अ गटात २० गुणांसह दुसरे स्थान कायम राखले. कोरियाकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने धक्का बसलेल्या भारताने नंतरच्या चारही लढती अपेक्षेप्रमाणे सहज जिंकल्या. इंग्लंडविरुद्धचा त्यांचा अखेरचा साखळी सामना होता. आता उपांत्य फेरीत गेलेल्या भारतीय संघाची गाठ कुणाशी पडते हे उद्या थायलंड-जपान लढतीनंतर स्पष्ट होईल.

वर्ल्डकपची ही लढत पाहण्यासाठी स्टेडियममध्ये कबड्डीचाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रो कबड्डी लीगला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर अशाचप्रकारची कबड्डी इथे होत असल्याचे अप्रूप इथल्या चाहत्यांमध्ये दिसून आले. प्रो कबड्डीतील स्टार खेळाडूंना भारतीय संघात प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. भारतीय संघाचा सर्वत्र जयघोष सुरू होता. कबड्डी-कबड्डी, माँ तुझे सलाम, भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी स्टेडियम दणाणून गेले.

भारतीय संघाच्या दबावापुढे इंग्लंडच्या दुबळ्या संघाचा निभाव लागला नाही. पहिल्या सत्रात ते ६-४५ असे मागे पडले. त्यात भारताने तब्बल चारवेळा इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद केला. एकूण पाचवेळा इंग्लंडला संपूर्ण नेस्तनाबूत करण्याची कामगिरी भारताने पार पाडली. त्यांना दोन अंकी गुण मिळविणेही अखेरच्या काही मिनिटांपर्यंत मुश्किल झाले होते. भारतातर्फे प्रदीप नरवाल, संदीप नरवाल, अजय ठाकूर अनुपकुमार यांनी चढाईपटू म्हणून आपली कामगिरी चोख बजावली. उत्तरार्धात मैदानात उतरलेल्या संदीप तोमरनेही इंग्लंडचा बचाव भेदला. तर संदीपने नेहमीप्रमाणे भक्कम पकडी करत अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पार पाडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज