अ‍ॅपशहर

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ५ लाख; फडणवीस यांची कोल्हापूरात घोषणा

5 Lakh To Prithviraj Patil: कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने शनिवारी सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर बक्षीस देण्यात आले नसल्याचे वृत्त समोर आले होते.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2022, 2:07 pm
कोल्हापूर: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला भारतीय जनता पक्षाकडून ५ लाख देऊन सत्कार करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलल्या फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज यांचा सत्कार केला जाईल आणि पुढच्या सरावासाठी ५ लाख रुपये दिले जातील, असे फडवणीस म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भाजपकडून पृथ्वीराज पाटीलला ५ लाख
5 lakh from bjp to maharashtra kesari prithviraj patil


वाचा- लाज गेली! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक प्रकार; विजेत्या पृथ्वीराज पाटील याला बक्षीसच मिळाले नाही

शनिवारी सातारा येथे झालेल्या लढतीत कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला पराभूत केले होते. पण या लढतीनंतर पृथ्वीराजला बक्षीस दिले नाही. याबद्दलची खंत पृथ्वीराजने बोलून दाखवली होती. पृथ्वीराजच्या विजयाने कोल्हापूरला २१ वर्षानंतर ही मानाची गदा मिळाली.

वाचा- इतिहास आहे साक्षीला मुंबई इंडियन्स घेणार 'फिनिक्स भरारी'; IPLचे सहावे विजेतेपद अशक्य नाही

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई पाहा काय म्हणाले...

पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. मल्ल प्रचंड मेहनतीने हा किताब मिळवतात बक्षीसच देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिलं जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सुचना दिल्या जातील. मात्र बक्षीसच न देणे ही मोठी चुक असल्याचं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलय.

वाचा- भारताच्या स्टार गोलंदाजावर दुःखाचा डोंगर कोसळला; प्रिय व्यक्तीचे निधन झाल्याने IPL सोडले

काल शनिवारी झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकर याचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटाकवला. कोल्हापूर जिल्ह्याला २१ वर्षानंतर मानाची गदा मिळाली. अवघ्या १९ वर्षाचा पृथ्वीराज पाटील हा शेतकरी कुटुंबातुन आलेला मुलगा आहे, त्यामुळे त्याची कामगिरी ही कौतुकास्पद मानली जातेय.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख