अ‍ॅपशहर

आर्मीचा रणजीतसिंग अव्वल

‘चला धाऊया, स्मार्ट ठाण्यासाठी’, असे घोषवाक्य असलेल्या यंदाची २८वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा रणजीतसिंगने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने १ तास १० मिनिटे आणि ६ सेंकदात अंतर पूर्ण केले. तर, महिलांच्या १५ किमी गटात नाशिकच्या भोसला मिलिट्री कॉलेजची आरती पाटील हीने अवघ्या ५७ मिनिटात अंतर पूर्ण करत अजिंक्यपदावर नाव कोरले. प्रथम आलेल्या या दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे ७५ हजार आणि ५० हजार तसेच मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले असले तरी स्मार्ट ठाण्यासाठी तब्बल २२ हजार स्पर्धक धावले.

Maharashtra Times 14 Aug 2017, 4:00 am
महेश गायकवाड, ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम armys ranjit singh won the race
आर्मीचा रणजीतसिंग अव्वल


‘चला धाऊया, स्मार्ट ठाण्यासाठी’, असे घोषवाक्य असलेल्या यंदाची २८वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा रणजीतसिंगने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने १ तास १० मिनिटे आणि ६ सेंकदात अंतर पूर्ण केले. तर, महिलांच्या १५ किमी गटात नाशिकच्या भोसला मिलिट्री कॉलेजची आरती पाटील हीने अवघ्या ५७ मिनिटात अंतर पूर्ण करत अजिंक्यपदावर नाव कोरले. प्रथम आलेल्या या दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे ७५ हजार आणि ५० हजार तसेच मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले असले तरी स्मार्ट ठाण्यासाठी तब्बल २२ हजार स्पर्धक धावले.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची सुरुवात पालिका मुख्यालय येथील चौकातून रविवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली. सकाळपासूनच दाटून आलेले ढग, त्यात मध्येच एखादी पावसाची येणारी जोरदार सर... तसेच ‘चला धाऊया, स्मार्ट ठाण्यासाठी’ हा जयघोष करत ही मॅरेथॉन पार पडली. पहिल्यांदाच ठाणे मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आर्मीचा रणजीत सिंग याने चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या २१ किमी गटात प्रथम क्रमांक मिळवला. याच गटातून भोसला मिलिट्री कॉलेजचा विद्यार्थी पिंटूकुमार यादव याने दुसरा तर अलिबागचा सुजीत गमरेने तृतीय क्रमांक पटकवला.

महिलांच्या १५ किमी गटात नाशिकच्या भोसला मिलिट्री कॉलेजची आरती पाटील प्रथम आली. विशेष म्हणजे तिची ही पहिलीच मॅरेथॉन होती. तरीही न डगमगता यश संपादन केले. याच गटात वर्षा भवारी (मुंबई पोलिस) हीने दुसरे तर पुण्याच्या संग्राम प्रतिष्ठानच्या ज्योती चव्हाणने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

काही ठिकाणी खड्डे

मॅरेथॉन मार्गावर काही ठिकाणी खड्डे होते. त्यामुळे धावताना थोडाफार त्रास झाल्याचे धावपटूंचे म्हणणे होते. पाय दुमडायचे असेही एका धावपटूने सांगितले.

अंतिम विजेते

१५ किमी महिला गट

प्रथम आरती पाटील वेळ ५७ मिनिटे

द्वितीय वर्षा भवारी ५७ मिनिटे १४ सेकंद

तृतीय ज्योती चौव्हाण ५९ मिनिटे ४२ सेकंद

२१ किमी पुरुष गट

प्रथम रणजित सिंग १ तास १० मिनिटे ६ सेकंद

द्वितीय पिंटू यादव १ तास ११ मिनिट ५० सेकंद

तृतीय सुजित गमरे १ तास ११ मिनिट ५२ सेकंद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज