अ‍ॅपशहर

भारताचा रुपेरी दिन

​​भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक मिळाले नसले तरी अॅथलेटिक्स आणि अश्वारोहणात भारताने पाच रौप्यपदकांची कमाई केली. अॅथलेटिक्समध्ये भारताचे आशास्थान असलेली हिमा दास, मोहम्मद अनास, दुती चंद यांनी रौप्यपदके जिंकली तर अश्वारोहणात फवाद मिर्झा व भारतीय संघाने रौप्यविजेती घोडदौड केली.

PTI 26 Aug 2018, 11:11 pm
जकार्ता :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asian-games


भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक मिळाले नसले तरी अॅथलेटिक्स आणि अश्वारोहणात भारताने पाच रौप्यपदकांची कमाई केली.

अॅथलेटिक्समध्ये भारताचे आशास्थान असलेली हिमा दास, मोहम्मद अनास, दुती चंद यांनी रौप्यपदके जिंकली तर अश्वारोहणात फवाद मिर्झा व भारतीय संघाने रौप्यविजेती घोडदौड केली. या रौप्यपदकांसह भारताची एकूण पदकसंख्या ३६ झाली आहे.

बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी उपांत्य फेरीत धडक मारून इतिहास रचला. यापूर्वी दोन खेळाडू आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या नव्हत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज