अ‍ॅपशहर

Asian Games: तिरंदाजीत भारतीय संघांना रुपेरी यश

तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी एकेक रौप्य पदक मिळवत आशियाई स्पर्धेतल्या भारताच्या खात्यात दोन पदकांची भर टाकली आहे. पुरुष आणि महिला संघांचा कोरियाविरुद्ध अंतिम सामन्यात निसटता पराभव झाला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2018, 1:01 pm
जकार्ता :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Archery


तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी एकेक रौप्य पदक मिळवत आशियाई स्पर्धेतल्या भारताच्या खात्यात दोन पदकांची भर टाकली आहे. पुरुष आणि महिला संघांचा दक्षिण कोरियाविरुद्ध अंतिम सामन्यात निसटता पराभव झाला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय पुरुष संघाचा कोरियाशी अटीतटीचा सामना झाला. चौथ्या सेटसाठी दोघांमध्ये बरोबरी झाली आणि शूट आऊटमध्ये भारतीय संघ मागे पडला. भारतीय पुरुष संघ लढतीत पहिल्यापासून आघाडीवर होता. पहिला सेट ६०-५६ असा जिंकत त्यांनी घेतलेली आघाडी घेतली होती, पण अखेरच्या सेटमध्ये टाय झाला आणि भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली.

दक्षिण कोरियाविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय महिला संघाचाही ५९-५७, ५६-५८, ५८-५८ आणि ५५-५९ असा निसटता पराभव झाला. मुस्कान किरार, मधुमिता कुमारी, ज्योती वेनम या तिघींनी या स्पर्धेची शानदार सुरुवात केली पण अखेरच्या सेटमध्ये त्या मागे पडल्या. मागील एशियाडच्या तुलनेत तिरंदाजीत यंदा भारताने चांगली कामगिरी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज