इपोह : सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज (शुक्रवार) भारत आणि आयर्लंड यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेत भारताला अर्जेंटिनाकडून २-३ असा, तर ऑस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर इंग्लंडने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. यानंतर चौथ्या लढतीत भारताने मलेशियावर मात करून आपले आव्हान राखले. पण भारताला अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. तसेच गटातील निकाल आपल्या बाजूने लागावे, अशी प्रार्थनाही करावी लागणार आहे. यात ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला नमवावे लागणार आहे, तर मलेशिया आणि इंग्लंड लढत बरोबरीत सुटायला हवी. तरच भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
हॉकीत आज भारत-आयर्लंड लढत
भारताला अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.
Maharashtra Times 9 Mar 2018, 12:17 am