वृत्तसंस्था, नवी दिल्ली
क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांच्यापेक्षा आपले गुण अधिक असल्यामुळे आपल्याला खेलरत्न मिळायला हवा, यावर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा कुस्तीगीर बजरंग पुनिया कायम असून त्याने क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांची भेट घेतली. राठोड यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.
बजरंग यासंदर्भात म्हणाला की, मी क्रीडा मंत्र्यांना शुक्रवारी भेटणार होतो पण गुरुवारी संध्याकाळीच त्यांच्याकडून बोलावणे आले. मी त्यांना विचारणा केली की, माझा खेलरत्नसाठी विचार न करण्यामागे काय कारण आहे? माझे पुरेसे गुण नाहीत, असा दावा त्यांनी केला पण ते चूक आहे. माझे विराट आणि मिराबाई यांच्यापेक्षा अधिक गुण आहेत. बजरंगने सांगितले की, मला न्याय हवा आहे. राठोड यात लक्ष घालणार आहेत, पण आता फार कमी वेळ उरला आहे. जर मला सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर मला न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
या पुरस्कारांसाठी गुणपद्धती सरकारने तयार केली असून त्यानुसार बजरंगचे ८० गुण होत आहेत तर क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ नसल्यामुळे विराटच्या खात्यात शून्य गुण जमा आहेत. तरीही बजरंगची निवड का केली गेली, याविषयी संभ्रम आहे. दरम्यान, मंत्रालयानेही बजरंगशी संपर्क साधून त्याचा विचार का करण्यात आला नाही, याचे विश्लेषण केले. शिवाय, यात लक्ष घालण्याचे आश्वासनही देण्यात आले.
तिरंदाजी प्रशिक्षक तेजा यांचा राजीनामा
चंदीगढ : द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीतून शेवटच्या क्षणी वगळण्यात आल्यानंतर तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आपल्यावर घोर अन्याय झाला. मी हा पुरस्कार मागितला नव्हता पण या पुरस्कार निवडीत पारदर्शकता असावी असे आपल्याला वाटते. तेजा हे जकार्तातील आशियाई स्पर्धेत भारताच्या कंपाऊंड संघासोबत गेले होते. तेजा यांच्यावर बेशिस्त वर्तनाचा आरोप ठेवून त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यावरून त्यांचे नाव पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आले.
मी जी चूक केली नव्हती त्यासाठी मला दोषी धरण्यात आले. राज्यवर्धन राठोड यांना या गोष्टी माहीत असतील. या प्रकरणात मला दोषी ठरविण्याचा प्रयत्न आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडेही हा मुद्दा मांडणार आहे.
क्रिकेटपटू विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांच्यापेक्षा आपले गुण अधिक असल्यामुळे आपल्याला खेलरत्न मिळायला हवा, यावर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा कुस्तीगीर बजरंग पुनिया कायम असून त्याने क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांची भेट घेतली. राठोड यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.
बजरंग यासंदर्भात म्हणाला की, मी क्रीडा मंत्र्यांना शुक्रवारी भेटणार होतो पण गुरुवारी संध्याकाळीच त्यांच्याकडून बोलावणे आले. मी त्यांना विचारणा केली की, माझा खेलरत्नसाठी विचार न करण्यामागे काय कारण आहे? माझे पुरेसे गुण नाहीत, असा दावा त्यांनी केला पण ते चूक आहे. माझे विराट आणि मिराबाई यांच्यापेक्षा अधिक गुण आहेत. बजरंगने सांगितले की, मला न्याय हवा आहे. राठोड यात लक्ष घालणार आहेत, पण आता फार कमी वेळ उरला आहे. जर मला सरकारकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर मला न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
या पुरस्कारांसाठी गुणपद्धती सरकारने तयार केली असून त्यानुसार बजरंगचे ८० गुण होत आहेत तर क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळ नसल्यामुळे विराटच्या खात्यात शून्य गुण जमा आहेत. तरीही बजरंगची निवड का केली गेली, याविषयी संभ्रम आहे. दरम्यान, मंत्रालयानेही बजरंगशी संपर्क साधून त्याचा विचार का करण्यात आला नाही, याचे विश्लेषण केले. शिवाय, यात लक्ष घालण्याचे आश्वासनही देण्यात आले.
तिरंदाजी प्रशिक्षक तेजा यांचा राजीनामा
चंदीगढ : द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीतून शेवटच्या क्षणी वगळण्यात आल्यानंतर तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी राष्ट्रीय कंपाऊंड तिरंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आपल्यावर घोर अन्याय झाला. मी हा पुरस्कार मागितला नव्हता पण या पुरस्कार निवडीत पारदर्शकता असावी असे आपल्याला वाटते. तेजा हे जकार्तातील आशियाई स्पर्धेत भारताच्या कंपाऊंड संघासोबत गेले होते. तेजा यांच्यावर बेशिस्त वर्तनाचा आरोप ठेवून त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यावरून त्यांचे नाव पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आले.
मी जी चूक केली नव्हती त्यासाठी मला दोषी धरण्यात आले. राज्यवर्धन राठोड यांना या गोष्टी माहीत असतील. या प्रकरणात मला दोषी ठरविण्याचा प्रयत्न आहे. हा माझ्यावर अन्याय आहे. मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडेही हा मुद्दा मांडणार आहे.