सी.के. नायडू क्रिकेट
राजकोट : एकीकडे मुंबई-सौराष्ट्र रणजी लढत अनिर्णीत ठरलेली असताना २३ वर्षांखालील मुलांच्या सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेत मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध तीन वैयक्तिक शतकांच्या जोरावर पहिल्या डावात १७७ धावांची मोठी आघाडी घेतली. रणजी संघातून बाहेर गेलेल्या हार्दिक तामोरेने सलामीला येत १३४ धावांची खेळी केली तर अग्नी चोप्रा (१३०) आणि चिन्मय सुतार (१०१ खेळत आहे) यांनीही शतके ठोकत मुंबईला ५ बाद ४५० धावा करून दिल्या.
सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना चार दिवसांच्या या सामन्यात २७३ धावा केल्या. त्यात तनुष कोटियनने ६८ धावांत ५ बळी घेत सौराष्ट्रला हादरविले.
स्कोअरबोर्ड : सौराष्ट्र २७३ (विश्वजित जाडेजा १२६, जय गोहील ४६, तनुष कोटियन ६८-५, श्रेयस गुरव ७८-२) वि. मुंबई ५ बाद ४५० (हार्दिक तामोरे १३४, अग्नी चोप्रा १३०, चिन्मय सुतार खेळत आहे १०१, गौरीश जाधव खेळत आहे ३८).