वृत्तसंस्था, लंडन
भारतीय हॉकी संघाने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचे आव्हान परतवून लावण्यात भारताला यश आले नाही. यामुळे विजेतेपदाच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. आज (शनिवार) आता पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठीच्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. साखळीत भारताने पाकिस्तानवर ७-१ असा मोठा विजय मिळवला आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध ‘फेव्हरिट’ समजले जात होते. मात्र, एक संघ म्हणून प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्सच्या खेळाडूंना आपली छाप पाडता आली नाही. या पराभवाने भारताच्या आगामी ‘हॉकी वर्ल्ड लीग फायनल’ आणि हॉकी वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करण्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण यजमान म्हणून या स्पर्धांमधील भारताचा प्रवेश निश्चित आहे. पण या दोन्ही स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धा महत्त्वाची आहे. आता पराभव बाजूला ठेवून भारताला पाकिस्तानविरुद्ध सज्ज व्हावे लागणार आहे.
भारताने साखळीत पाकिस्तानला पराभूत केले आहे. या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान संघ निश्चितच प्रयत्न करील. दुसरीकडे, भारतीय संघ मागील चुका टाळण्याचा प्रयत्न करील. भारताला पेनल्टी कॉर्नरवर अधिक भर द्यावा लागणार आहे. त्याचसोबत पहिल्या सत्रातच प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व कसे राखता येईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सुरुवात चांगली आणि शेवटही चांगला करण्याचा मानस असल्याचे प्रशिक्षक सातत्याने सांगत आहेत. पण यात अजून तरी यश आलेले नाही. रमनदीप आणि आकाशदीपला मनदीपसिंग, तलविंदरसिंग आणि एस. व्ही. सुनीलकडून अधिक मदत मिळण्याची गरज आहे.
पाकिस्तानला नेदरलँड्सकडून ४-०ने, कॅनडाकडून ६-०ने, भारताकडून ७-१ने पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानने स्कॉटलंडवर ३-१ने मात करून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. या फेरीत पाक संघाने ऑलिंपिक चॅम्पियन्स अर्जेंटिनाला चांगलेच झुंजविले. अर्जेंटिनाने ही लढत ३-१ अशी जिंकली असली, तरी पाकिस्तानच्या खेळाचे कौतुक झाले आहे. त्यामुळे भारताला सावध खेळ करावा लागणार आहे.
भारतीय हॉकी संघाने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाचे आव्हान परतवून लावण्यात भारताला यश आले नाही. यामुळे विजेतेपदाच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. आज (शनिवार) आता पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठीच्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. साखळीत भारताने पाकिस्तानवर ७-१ असा मोठा विजय मिळवला आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताला उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाविरुद्ध ‘फेव्हरिट’ समजले जात होते. मात्र, एक संघ म्हणून प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्सच्या खेळाडूंना आपली छाप पाडता आली नाही. या पराभवाने भारताच्या आगामी ‘हॉकी वर्ल्ड लीग फायनल’ आणि हॉकी वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करण्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण यजमान म्हणून या स्पर्धांमधील भारताचा प्रवेश निश्चित आहे. पण या दोन्ही स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धा महत्त्वाची आहे. आता पराभव बाजूला ठेवून भारताला पाकिस्तानविरुद्ध सज्ज व्हावे लागणार आहे.
भारताने साखळीत पाकिस्तानला पराभूत केले आहे. या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाकिस्तान संघ निश्चितच प्रयत्न करील. दुसरीकडे, भारतीय संघ मागील चुका टाळण्याचा प्रयत्न करील. भारताला पेनल्टी कॉर्नरवर अधिक भर द्यावा लागणार आहे. त्याचसोबत पहिल्या सत्रातच प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व कसे राखता येईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सुरुवात चांगली आणि शेवटही चांगला करण्याचा मानस असल्याचे प्रशिक्षक सातत्याने सांगत आहेत. पण यात अजून तरी यश आलेले नाही. रमनदीप आणि आकाशदीपला मनदीपसिंग, तलविंदरसिंग आणि एस. व्ही. सुनीलकडून अधिक मदत मिळण्याची गरज आहे.
पाकिस्तानला नेदरलँड्सकडून ४-०ने, कॅनडाकडून ६-०ने, भारताकडून ७-१ने पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानने स्कॉटलंडवर ३-१ने मात करून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. या फेरीत पाक संघाने ऑलिंपिक चॅम्पियन्स अर्जेंटिनाला चांगलेच झुंजविले. अर्जेंटिनाने ही लढत ३-१ अशी जिंकली असली, तरी पाकिस्तानच्या खेळाचे कौतुक झाले आहे. त्यामुळे भारताला सावध खेळ करावा लागणार आहे.