वृत्तसंस्था, लंडन
भारतीय संघाने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धेत सलग तीन विजय नोंदविले आहेत. आता सलग चौथ्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र, या वेळी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताची कसोटी लागणार आहे. कारण आज (मंगळवार) भारतासमोर आव्हान आहे, ते जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्स संघाचे.
भारतीय खेळाडू फॉर्मात आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला मोठा विजय भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य उंचावणारा ठरला आहे. आता गरज आहे ती पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्याची. या एका गोष्टीवर भारतीय खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना भारताचा कर्णधार मनप्रीतसिंग म्हणाला, ‘आमच्यासाठी पाकिस्तानविरुद्धचा विजय महत्त्वाचा ठरला. तो पाकिस्तानविरुद्ध मिळवला म्हणून नाही, तर ज्या गोष्टींबाबत आम्ही साशंक होतो (पेनल्टी कॉर्नर) त्यात आम्ही चांगली कामगिरी केली. लंडनला येण्यापूर्वी आम्ही जर्मनीत निमंत्रितांची हॉकी स्पर्धा खेळलो. त्यात काही उणीवा समोर आल्या होत्या. त्यावर मात करण्यात आम्हाला यश आले. यात सातत्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’
भारताचे रमनदीपसिंग, आकाशदीपसिंग आणि तलविंदरसिंग फॉर्मात आहेत. या आघाडीच्या फळीने स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मधल्या फळीतील सरदारसिंग, मनप्रीतसिंग यांची त्यांना चांगली साथ मिळत आहे. रुपिंदरपालसिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतसिंगने आतापर्यंत दोन गोल केले आहेत. त्याचबरोबर नियमित गोलकीपर पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू विकास दाहिया आणि आकाश चिकटे यांनी आपली छाप पाडली आहे.
भारताची नेदरलँड्सविरुद्ध अखेरची लढत रिओ ऑलिंपिकमध्ये झाली होती. यात भारताने नेदरलँड्सला चांगली टक्कर दिली होती. मात्र, भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. २०१५मध्ये ‘हॉकी वर्ल्ड लीग फायनल’ स्पर्धेत भारताने ५-५ अशा बरोबरीनंतर शूटआउटमध्ये नेदरलँड्सला ३-२ असे नमविले होते. तसेच २०१४च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने नेदरलँड्सला ३-२ असे नमविले आहे.
‘कामगिरी अद्याप संपलेली नाही’
‘आतापर्यंतच्या संघाच्या कामगिरीने मी समाधानी आहे. पण अद्याप आमचे काम संपलेले नाही. आम्हाला आक्रमकपणा कायम राखायचा आहे, तसेच आमच्या योजना १०० टक्के यशस्वी करायच्या आहेत. नेदरलँड्सचीही स्पर्धेची सुरुवात चांगली झाली आहे. नेदलँड्सविरुद्ध आमची यापूर्वीची कामगिरी काय होती, याचा आम्हाला विचार करायचा नाही. कारण २०१५, २०१६च्या तुलनेत दोन्ही संघ आता नवीन आहेत. त्यामुळे भूतकाळातील निकालाची आताच्या परिस्थितीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. म्हणून आम्हाला केवळ नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आमच्या योजनांवर कायम राहायचे असून, सुरुवात जशी झाली, तसा शेवटही चांगला करायचा आहे,’ असे मत भारताचे प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.
वैशिष्ट्ये
• ‘ब’ गटात भारतीय संघ सलग तीन विजय मिळवून ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे.•भारतीय संघाने पहिल्या लढतीत स्कॉटलंडवर ४-१ने, कॅनडावर ३-०ने, तर पाकिस्तानवर ७-१ने विजय मिळवला आहे.•नेदरलँड्स संघाने पहिल्या लढतीत पाकिस्तानवर ४-०ने, तर स्कॉटलंडवर ३-०ने विजय मिळवला आहे.•नेदरलँड्सच्या तुलनेत भारताने अधिक गोल नोंदविले आहेत.•भारताने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.•भारत-नेदरलँड्समधील विजेता संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. त्यामुळे बाद फेरीत या विजेत्या संघाला ‘अ’ गटात चौथ्या स्थानी राहिलेल्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.
भारतीय संघाने ‘हॉकी वर्ल्ड लीग सेमी-फायनल’ स्पर्धेत सलग तीन विजय नोंदविले आहेत. आता सलग चौथ्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र, या वेळी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारताची कसोटी लागणार आहे. कारण आज (मंगळवार) भारतासमोर आव्हान आहे, ते जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्स संघाचे.
भारतीय खेळाडू फॉर्मात आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला मोठा विजय भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य उंचावणारा ठरला आहे. आता गरज आहे ती पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्याची. या एका गोष्टीवर भारतीय खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना भारताचा कर्णधार मनप्रीतसिंग म्हणाला, ‘आमच्यासाठी पाकिस्तानविरुद्धचा विजय महत्त्वाचा ठरला. तो पाकिस्तानविरुद्ध मिळवला म्हणून नाही, तर ज्या गोष्टींबाबत आम्ही साशंक होतो (पेनल्टी कॉर्नर) त्यात आम्ही चांगली कामगिरी केली. लंडनला येण्यापूर्वी आम्ही जर्मनीत निमंत्रितांची हॉकी स्पर्धा खेळलो. त्यात काही उणीवा समोर आल्या होत्या. त्यावर मात करण्यात आम्हाला यश आले. यात सातत्य राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’
भारताचे रमनदीपसिंग, आकाशदीपसिंग आणि तलविंदरसिंग फॉर्मात आहेत. या आघाडीच्या फळीने स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मधल्या फळीतील सरदारसिंग, मनप्रीतसिंग यांची त्यांना चांगली साथ मिळत आहे. रुपिंदरपालसिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतसिंगने आतापर्यंत दोन गोल केले आहेत. त्याचबरोबर नियमित गोलकीपर पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू विकास दाहिया आणि आकाश चिकटे यांनी आपली छाप पाडली आहे.
भारताची नेदरलँड्सविरुद्ध अखेरची लढत रिओ ऑलिंपिकमध्ये झाली होती. यात भारताने नेदरलँड्सला चांगली टक्कर दिली होती. मात्र, भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. २०१५मध्ये ‘हॉकी वर्ल्ड लीग फायनल’ स्पर्धेत भारताने ५-५ अशा बरोबरीनंतर शूटआउटमध्ये नेदरलँड्सला ३-२ असे नमविले होते. तसेच २०१४च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने नेदरलँड्सला ३-२ असे नमविले आहे.
‘कामगिरी अद्याप संपलेली नाही’
‘आतापर्यंतच्या संघाच्या कामगिरीने मी समाधानी आहे. पण अद्याप आमचे काम संपलेले नाही. आम्हाला आक्रमकपणा कायम राखायचा आहे, तसेच आमच्या योजना १०० टक्के यशस्वी करायच्या आहेत. नेदरलँड्सचीही स्पर्धेची सुरुवात चांगली झाली आहे. नेदलँड्सविरुद्ध आमची यापूर्वीची कामगिरी काय होती, याचा आम्हाला विचार करायचा नाही. कारण २०१५, २०१६च्या तुलनेत दोन्ही संघ आता नवीन आहेत. त्यामुळे भूतकाळातील निकालाची आताच्या परिस्थितीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. म्हणून आम्हाला केवळ नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आमच्या योजनांवर कायम राहायचे असून, सुरुवात जशी झाली, तसा शेवटही चांगला करायचा आहे,’ असे मत भारताचे प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.
वैशिष्ट्ये
• ‘ब’ गटात भारतीय संघ सलग तीन विजय मिळवून ९ गुणांसह अव्वल स्थानी आहे.•भारतीय संघाने पहिल्या लढतीत स्कॉटलंडवर ४-१ने, कॅनडावर ३-०ने, तर पाकिस्तानवर ७-१ने विजय मिळवला आहे.•नेदरलँड्स संघाने पहिल्या लढतीत पाकिस्तानवर ४-०ने, तर स्कॉटलंडवर ३-०ने विजय मिळवला आहे.•नेदरलँड्सच्या तुलनेत भारताने अधिक गोल नोंदविले आहेत.•भारताने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.•भारत-नेदरलँड्समधील विजेता संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानी राहणार आहे. त्यामुळे बाद फेरीत या विजेत्या संघाला ‘अ’ गटात चौथ्या स्थानी राहिलेल्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.