रांची : भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील तिसऱ्या कसोटीतही शरणागती पत्करली. भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ धावांत गुंडाळले. फॉलोऑननंतर तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात ८ बाद १३२ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवण्यासाठी आणि तिसरी कसोटी डावाने जिंकण्यासाठी भारताला आता केवळ दोन विकेटची गरज आहे.
भारत विजयासमीप
भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील तिसऱ्या कसोटीतही शरणागती पत्करली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2019, 4:00 am