वृत्तसंस्था, गुवाहाटी
येथे झालेल्या जागतिक युवा महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकांची घसघशीत कमाई केली. प्रथमच भारताच्या खात्यात इतक्या संख्येने पदके जमा झाली आहेत. नीतू (४८ किलो), ज्योती गुलिया (५१ किलो), साक्षी चौधरी (५४ किलो), शशी चोप्रा (५७ किलो) व अंकुशिता बोरो (६४ किलो) यांनी ही पदके जिंकली.
या अंतिम फेरीदरम्यान लागलेल्या एका छोट्या आगीमुळे सामने जवळपास ४५ मिनिटे थांबविण्यात आले. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. प्रेक्षक बसण्याच्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ वायर जळू लागली आणि त्यामुळे ही आग लागली.
भारताच्या या पाच खेळाडूंपैकी ज्योती ही पुढील वर्षी होत असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्र ठरली. अर्जेंटिनात ही स्पर्धा होणार आहे. ती १९९९मध्ये जन्मलेली असल्यामुळे निकषात बसली.
भारताने या सुवर्णपदकांसह नेहा यादव (८१ पेक्षा अधिक), अनुपमा (८१ किलो) यांनीही भारताच्या खात्यात दोन ब्राँझपदके टाकली. स्थानिक खेळाडू अंकुशिता ही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरली. याआधी भारताला या स्पर्धेत केवळ एकच ब्राँझ पदक मिळाले होते. २०११नंतर तर भारताला सुवर्णही मिळाले नव्हते. त्यावेळी सर्जूबालाने भारताला एक सुवर्ण जिंकून दिले होते.
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले की, या स्पर्धेतील कामगिरीमुळे एक आशा वाटते आहे की, २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये भारत नक्कीच पदक मिळवू शकेल.
कझाकस्तानच्या झझीराविरुद्ध भारताच्या नीतूने सहज विजय मिळविला. स्वतः नीतूनेही ही लढत उपांत्य फेरीच्या तुलनेत सोपी होती, असे सांगितले. त्या तुलनेत ज्योती गुलियाला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिनाकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. पण तिने तरीही बाजी मारली.
सुवर्णविजेत्यांना २ लाख
या पाचही सुवर्णविजेत्या खेळाडूंना प्रत्येकी २ लाख देणार असल्याची घोषणाही अजय सिंग यांनी केली.
येथे झालेल्या जागतिक युवा महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकांची घसघशीत कमाई केली. प्रथमच भारताच्या खात्यात इतक्या संख्येने पदके जमा झाली आहेत. नीतू (४८ किलो), ज्योती गुलिया (५१ किलो), साक्षी चौधरी (५४ किलो), शशी चोप्रा (५७ किलो) व अंकुशिता बोरो (६४ किलो) यांनी ही पदके जिंकली.
या अंतिम फेरीदरम्यान लागलेल्या एका छोट्या आगीमुळे सामने जवळपास ४५ मिनिटे थांबविण्यात आले. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. प्रेक्षक बसण्याच्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ वायर जळू लागली आणि त्यामुळे ही आग लागली.
भारताच्या या पाच खेळाडूंपैकी ज्योती ही पुढील वर्षी होत असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्र ठरली. अर्जेंटिनात ही स्पर्धा होणार आहे. ती १९९९मध्ये जन्मलेली असल्यामुळे निकषात बसली.
भारताने या सुवर्णपदकांसह नेहा यादव (८१ पेक्षा अधिक), अनुपमा (८१ किलो) यांनीही भारताच्या खात्यात दोन ब्राँझपदके टाकली. स्थानिक खेळाडू अंकुशिता ही स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरली. याआधी भारताला या स्पर्धेत केवळ एकच ब्राँझ पदक मिळाले होते. २०११नंतर तर भारताला सुवर्णही मिळाले नव्हते. त्यावेळी सर्जूबालाने भारताला एक सुवर्ण जिंकून दिले होते.
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले की, या स्पर्धेतील कामगिरीमुळे एक आशा वाटते आहे की, २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये भारत नक्कीच पदक मिळवू शकेल.
कझाकस्तानच्या झझीराविरुद्ध भारताच्या नीतूने सहज विजय मिळविला. स्वतः नीतूनेही ही लढत उपांत्य फेरीच्या तुलनेत सोपी होती, असे सांगितले. त्या तुलनेत ज्योती गुलियाला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिनाकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. पण तिने तरीही बाजी मारली.
सुवर्णविजेत्यांना २ लाख
या पाचही सुवर्णविजेत्या खेळाडूंना प्रत्येकी २ लाख देणार असल्याची घोषणाही अजय सिंग यांनी केली.