अ‍ॅपशहर

भारताला दुहेरी मुकुट

तेहरान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतीपदे पटकाविण्याचा पराक्रम केला.

Maharashtra Times 27 Nov 2017, 12:30 am
मुंबई : तेहरान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतीपदे पटकाविण्याचा पराक्रम केला. प्रथमच या दोन संघांना एकाच स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३६-२२ अशी मात करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अजय ठाकूर, संदीप नरवाल यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने ही कामगिरी करून दाखवली. तर मुंबईकर अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखालील महिला संघाने कोरियावर ४२-२० असा सहज विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india won in both categories in asian kabaddi
भारताला दुहेरी मुकुट


भारतीय पुरुष संघाने साखळीतही पाकिस्तानवर मात केली होती. उपांत्य सामन्यात भारताची गाठ कोरियाशी पडली होती आणि त्यात भारताने बाजी मारली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इराणला पराभूत करण्याची कमाल केली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मात्र भारताचे पारडे जड होते. पूर्वार्धात भारताने २५-१० अशी आघाडी घेतली होती. त्यात नंतर प्रदीप नरवाल, मणिंदरसिंग यांनी अजय ठाकूरला सहाय्य केले आणि सुरेंद्र नाडाच्या पकडींचाही लाभ भारताला झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज