नवी दिल्ली : भारताच्या महिला बॉक्सर्सनी जागतिक स्पर्धेतील घोडदौड कायम राखली. भारताच्या आठ महिला उपांत्यपूर्व फेरीत धडकल्या आहेत. सोनिया चहल (५७ किलो), पिंकी राणी (५१ किलो), सिमरनजीत कौर (६४ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. साविती बूराला मात्र पराभव पत्करावा लागला. त्याआधी, मेरी कोम, मनिषा मौन, लव्हलिना बोर्गोहेन, भाग्यबती यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. २००६मध्ये भारताने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करताना ८ पदके जिंकली होती. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होते का ते पाहायचे.
भारतीय बॉक्सर्सची घोडदौड
भारताच्या महिला बॉक्सर्सनी जागतिक स्पर्धेतील घोडदौड कायम राखली भारताच्या आठ महिला उपांत्यपूर्व फेरीत धडकल्या आहेत...
Maharashtra Times 20 Nov 2018, 4:00 am