अ‍ॅपशहर

पाकमुळे हॉकी इंडिया स्पर्धेत खेळणार नाही

भारतीय पुरूष हॉकी संघाने सलग दुसऱ्या वर्षीच्या मलेशिया सुलतान जोहोर हॉकी स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार असल्याने आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे भारतीय पुरूष हॉकी संघाने जाहीर केले आहे. जो पर्यंत २०१४ च्या चॅम्पियन ट्रॉफी वादाप्रकरणी पाकिस्तान विनाअट माफी मागत नाही तो पर्यंत भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही मालिकेत खेळणार नाही असे म्हणत भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेचे कारण स्पष्ट केले आहे.

Maharashtra Times 14 Apr 2017, 7:19 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian hockey team to skip sultan of johor cup due to pakistan presence
पाकमुळे हॉकी इंडिया स्पर्धेत खेळणार नाही


भारतीय पुरूष हॉकी संघाने सलग दुसऱ्या वर्षीच्या मलेशिया सुलतान जोहोर हॉकी स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार असल्याने आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे भारतीय पुरूष हॉकी संघाने जाहीर केले आहे. जो पर्यंत २०१४ च्या चॅम्पियन ट्रॉफी वादाप्रकरणी पाकिस्तान विनाअट माफी मागत नाही तो पर्यंत भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही मालिकेत खेळणार नाही असे म्हणत भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेचे कारण स्पष्ट केले आहे.

सुलतान जोहोर कप स्पर्धा अंडर-२१ स्पर्धा आहे. भारताने २०१५ मध्ये या स्पर्धेचा खिताब पटकावला होता. ही 'एफआयएच' किंवा एखाद्या उपमहाद्वीपीय संस्थेअंतर्गत आयोजित केली जाणारी जागतिक स्तरावरील स्पर्धा नाही.

हॉकी इंडियाने पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळणार नसल्याचा आपला निर्णय जानेवारी महिन्यात जाहीर केला होता.

स्पर्धेत पाकिस्तानी संघाने भाग घ्यावा असे भारताला वाटत नाही असा थेट आरोप लखनऊमधील २०१६ ज्यूनिअर विश्वकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने केला होता. भारताने पाकचा हा आरोप फेटाळून लावला होता. शेवटी पाकिस्तानने ज्यूनिअर विश्वकप स्पर्धेत भाग घेतला नव्हताच.

'हॉकी इंडिया आणि संघाच्या खेळाडूंनी २०१४ मध्ये घडलेली घटना बाजूला सारली, मात्र नुकतेच 'पीएचएफ'द्वारे करण्यात आलेल्या आरोपांमुळे भारताने या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला', अशी प्रतिक्रिया हॉकी इंडियाचे प्रवक्ता आर. पी. सिंह यांनी व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, जो पर्यंत पाकिस्तान २०१४ च्या घटनेबाबत बिनशर्थ माफी मागणार नाही, तो पर्यंत भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत हे सुलतान जोहोर कप स्पर्धेपासून भारतीय संघाला अलिप्त ठेवून दाखवून दिले आहे. सुलतान जोहोर स्पर्धा ही अनिवार्य स्पर्धा नाही. म्हणूनच हॉकी इंडियाने या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सिंह पुढे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज