अ‍ॅपशहर

इनडोअर तिरंदाजीत आठ ऑलिम्पियन खेळणार

वृत्तसंस्था, कोलकातायेथील नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये होत असलेल्या भारतातील पहिल्याच इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताची आघाडीची ...

Maharashtra Times 27 Oct 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, कोलकाता

येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये होत असलेल्या भारतातील पहिल्याच इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताची आघाडीची खेळाडू दीपिका कुमारी आणि अभिषेक वर्मा सहभागी होणार आहेत.

ही निमंत्रितांची स्पर्धा राहुल आणि डोला बॅनर्जी या भाऊ-बहिणीने आयोजित केली असून, या स्पर्धेत रिकर्व्हमधील आठ ऑलिम्पियन खेळाडू सहभागी होणार आहेत. दीपिकासह डोला व राहुल, अतनु दास, लैशराम बोम्बायला देवी, तरुणदीप राय, मंगलसिंग चंपिया, लक्ष्मीराणी माँझी या खेळाडूंचा सहभाग स्पर्धेचा दर्जा उंचावणारा असेल. प्रेक्षकांचा विचार करून टार्गेट हे नेहमीच्या ७० मीटरऐवजी १८ मीटरवर ठेवण्यात येईल. त्याशिवाय, आऊटडोअर स्पर्धेत जो निर्धारित वेळ असतो त्यापेक्षा कमी वेळेत इनडोअरमधील ही स्पर्धा पार पडेल. तिरंदाजीत भविष्यात या प्रकारावर जास्त भर देण्यात येईल, असे सांगताना राहुल बॅनर्जी म्हणतो की, या स्पर्धेत आठ ऑलिम्पिकपटू खेळत आहेत, हे अधिक समाधानकारक आहे. पहिल्या दिवशी पात्रता फेऱ्या पार पडतील त्यात प्रत्येक तिरंदाज ६० बाण मारेल. त्यानंतर रिकर्व्ह आणि कंपाऊंडमध्ये चार गटात एलिमिनेशन होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज