अ‍ॅपशहर

लोढांच्या शिफारशींना ५० वर्षे उशीरच झाला!

गेल्या काही दशकांपासून भारतीय क्रिकेटच्या प्रशासनातील सर्वच गोष्टी इतक्या पक्क्या होऊन गेल्या होत्या की, लोढा समितीच्या शिफारशी या ५० वर्षांपूर्वीच येणे आवश्यक होते, असे भाष्य भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी केले आहे.

Maharashtra Times 24 Jan 2017, 4:00 am
जयपूर : गेल्या काही दशकांपासून भारतीय क्रिकेटच्या प्रशासनातील सर्वच गोष्टी इतक्या पक्क्या होऊन गेल्या होत्या की, लोढा समितीच्या शिफारशी या ५० वर्षांपूर्वीच येणे आवश्यक होते, असे भाष्य भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lodha committee reforms should have come 50 years ago bedi
लोढांच्या शिफारशींना ५० वर्षे उशीरच झाला!

बेदी यांचा समावेश असलेल्या २८ खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अन्य खेळातही अशा सुधारणा व्हाव्यात अशी मागणी केली आहे. शिवाय, बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी ज्या प्रशासकांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयामार्फत आज करण्यात येणार आहे, त्यातही बेदींचे नाव असल्याची चर्चा आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना बेदी म्हणाले की, क्रिकेट प्रशासनात या सुधारणा ५० वर्षांपूर्वीच यायला हव्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून यात उडी घेतलेली नाही तर क्रिकेट प्रशासनात प्रामाणिकपणा यावा हाच त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून लोढा समितीच्या शिफारशी महत्त्वाच्या ठरतात.
बेदींनी सांगितले की, लोढांच्या शिफारशींमुळे सुरुवात झाली आहे पण काही राज्य संघटनांत असे पदाधिकारी आहेत, ज्यांना पद आणि विविध सुविधा सोडवत नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज