वलसाड : विजय मर्चंट १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गुजरातला सलामीच्या सामन्यात पहिल्या दिवशी ८९.५ षटकांत ९ बाद २०१ धावांवर रोखले. मुंबईच्या अनुराग सिंगने सर्वाधिक ३ बळी घेतले. वयाच्या मुद्द्यावरून मुंबईचा कर्णधार जश गणिगा, अमन तिवारी आणि जय धात्रक यांना माघारी पाठविण्यात आल्यानंतर तीनजणांना त्यांच्या जागी निवडण्यात आले. पण या सामन्यात ते खेळलेले नाहीत. आयुष जेठवाकडे मुंबईचे नेतृत्व सोपविण्यात आले. गुजराततर्फे सलामीवीर वेद पटेलने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तर ठक्करने ४६ धावांची खेळी केली.
मुंबईने गुजरातला रोखले
विजय मर्चंट १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गुजरातला सलामीच्या सामन्यात पहिल्या दिवशी ८९५ षटकांत ९ बाद २०१ धावांवर रोखले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2019, 4:00 am